शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:29 IST

कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन कांदा उत्पादक शेतकरी संतप्त

कळवण : कांद्याचे निर्यातमूल्य ८५० डॉलर करण्याचा सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात असून, शहरी भागातील जनतेला खूश ठेवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या भावनांशी सरकार खेळते आहे. निर्यातमूल्य वाढल्याने व्यापारी बांधवांना कांदा निर्यातीसाठीच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे देशांतर्गत विक्र ीस प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे बाजारभावात कांदा स्वस्त होईल असे गणित असल्याने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने कळवणमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  किरकोळ बाजारातले कांद्याचे दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन ८५० डॉलरची ईएमपी अर्थात निर्यातमूल्य आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन येणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, गुजरातची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला असल्याचे सांगून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली असल्याने कांदा उत्पादक शेतकरीचे नुकसान होणार असल्याने निर्यातमूल्य वाढविणे चुकीचे आहे, असे मत कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी व्यक्त केले.  या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल अशी आशा सरकारला वाटतेय. तर हा निर्णय शेतकरीविरोधी असल्याचे मत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.  यंदा कांद्याचं उत्पादन मुळातच कमी आणि त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांद्याचे बाजारभाव फारसे कमी होणार नाहीत असे कांदा व्यापारी हेमंत बोरसे व सुनील महाजन यांनी सांगितले.   केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य शून्यावरून थेट ८५० डॉलरपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुरु वारी घेतल्याने गेल्या दोन वर्षांपासून कांद्यावर निर्यातमूल्य आकारले जात नव्हते. मात्र, वाणिज्य मंत्रालयाच्या गुरु वारच्या निर्णयामुळे कांद्याची निर्यात घटणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कोसळण्याची भीती आहे.  - धनंजय पवार, सभापती, कळवण बाजार समितीजनतेला महाग कांदा खरेदी करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला तेजी आली आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा ४४४० रु पये प्रतिक्विंटल भावाने विकला गेला. शेतकरी बांधवांना दोन पैसे मिळू लागल्याने हे सहन झाले नाही.  - रवींद्र देवरे, माजी सभापती, अर्थ समिती, जि. प

टॅग्स :Marketबाजारonionकांदा