शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी कळवणला सर्वपक्षीय आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:56 IST

कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देकांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट:बस स्थानकाजवळ ठिय्या मांडून रस्ता रोको

कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जेष्ठ नेते रविंद्र देवरे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शेतकरी नेते शांताराम जाधव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणबाजी करु न आंदोलन केले.केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कळवण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकºयांचा वाया गेला असतांना फक्त २ ते ४ रु पये किलो भाव मिळत होता. शेतकºयांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता, भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला तो ही चाळीत सडला. थोडाफार शिल्लक राहिला. त्याला समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकºयांच्या हातात काही राहणार नाही.त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकºयांना मिळत असणाºया गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील अशी भीती यावेळी उपस्थितमान्यवरांनी व्यक्त करु न निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.रस्ता रोको आंदोलनात घनश्याम पवार, पोपट पवार, जितेंद्र पगार,भाऊसाहेब पवार, प्रदीप पगार, टिनू पगार, दादा जाधव, रामा पाटील, मधुकर वाघ, रमेश पाटील, जगन पाटील, प्रल्हाद देवरे, संदीप वाघ, गोरख देवरे, महेंद्र पवार, काशिनाथ गुंजाळ, दिलीप शेवाळे, अमोल रौंदळ, राहूल पवार, नितीन पवार, वैभव देवरे, नितीन खैरनार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी