शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हरित गणेशोत्सव साजरा करून नावलौकिक राखा

By admin | Updated: August 27, 2016 22:12 IST

अंकुश शिंदे : सणापासून राजकारण बाजूला ठेवण्याची सिन्नरकरांची ग्वाही

 सिन्नर : जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असलेल्या सिन्नरवासीयांनी पारंपरिक सण-उत्सव साजरा करण्याची प्रथा चांगल्या पद्धतीने जपली आहे. यापुढील काळातही सिन्नरकरांनी विविध प्रकारचे प्रदूषण टाळून हरित गणेशोत्सव साजरा करून नवलौकिक कायम राखावा, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख अंकुश शिंदे यांनी केले. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली सिन्नर, वावी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी यांची बैठक पार पडली. यावेळी गणशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य यांना मार्गदर्शन करतांना शिंदे बोलत होते. नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीत गणशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व शांतता समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विविध सूचनांवर अधीक्षक शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. राज्याच्या जडणघडणीत गणशोत्सवाचे योगदान मोठे असल्याचे शिंदे म्हणाले. गणशोत्सवामुळेच अनेक नेते व कार्यकर्ते घडले. गणेशोत्सवाची सर्वांना माहिती आहेच; त्यामुळे मार्गदर्शन करण्याऐवजी आपण केवळ उजळणी म्हणून शांतता समितीची बैठक घेतल्याचे शिंदे म्हणाले. शासनाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव अभियान सुरू केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊन शहर व तालुक्यातील मंडळांनी जास्तीत जास्त पारितोषिके मिळवावी, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांच्या अडीअडचणी व सर्वांमध्ये समन्वय असावा यासाठी महसूल, पोलीस, वीज वितरण व अन्य खात्याचे एक संयुक्त पथक असावे यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या संयुक्त पथकामुळे अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते असे ते म्हणाले. सण-उत्सवामध्ये काही अपप्रवृत्तींनी प्रवेश केला आहे. त्या बाजूला काढून शांततेत व मोठ्या आनंदात गणेशोत्सव व येणारे सण साजरे करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. गणेशोत्सवात समाजपयोगी देखावे सादर करावे, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परिसराची स्वच्छता राखावी व गणेशोत्सवाचा महिला व आबालवृद्धांना बिनधास्तपणे आनंद घेता येईल अशी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले. कायदा पोलीस बनवत नाही, तो लोकप्रतिनिधी बनवतात. राजकारण गरम झाल्यानंतर कायदा आणखी जागरूक होतो. त्यामुळे कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. वाईट कृत्यामुळे नाव बदनाम होणार नाही याची काळजी घेऊन शहराचे नाव चांगले ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व शहराचा नावलौकिक कायम राखावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.शहरातील खड्डे बुजवावे, जलप्रदूषण टाळावे, वादग्रस्त देखावे व बॅनर टाळावे, अवैध धंदे बंद करावे, स्वच्छता मोहीम राबवावी, एक गाव एक गणपती उपक्रम राबवावा, विसर्जन मिरवणूक वेळेचे बंधन पाळावे, सण-उत्सवाच्या काळात दारू दुकाने बंद ठेवावीत आदिंसह अनेक सूचना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, डॉ. विष्णू अत्रे, विष्णू गोजरे, ईलियास खतीब, खंडेराव सांगळे, मच्छिंद्र चिने यांच्यासह उपस्थितांनी मांडल्या. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची व स्वच्छता मोहीम पालिकेकडून राबविली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांनी दिली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांनी नागरिकांच्या सूचनांना उत्तरे दिली. उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगेटे, हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक रणजित आंधळे, उपनगराध्यक्ष संजय नवसे, नगरसेवक मल्लू पाबळे, विजय जाधव, शैलेश नाईक, मेहमूद दारूवाला, राजश्री कपोते, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे, राजाराम मुरकुटे, रवींद्र काकड, संजय झगडे, विनायक सांगळे, दीपक खुळे, पिराजी पवार, संजय चव्हाणके, काशिनाथ भालेराव, मनीष गुजराथी, पंकज जाधव, मच्छिंद्र चिने यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)