शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

निवड होऊनही उमेदवारांना नियुक्तीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:38 IST

पंचवटी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरती अंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबरला ३२७ कनिष्ठ अभियंता जागांकरिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचा निकाल जानेवारी २०२० रोजी लागला आहे. सदर निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली आहे मात्र निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दयावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देप्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट

पंचवटी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सरळसेवा भरती अंतर्गत गेल्या वर्षी नोव्हेंबरला ३२७ कनिष्ठ अभियंता जागांकरिता परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सदर परीक्षेचा निकाल जानेवारी २०२० रोजी लागला आहे. सदर निकालास अनुसरून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली आहे मात्र निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्र दयावे अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर भरती सोबत महाराष्ट्र राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई मेट्रो यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या त्या उमेदवारांना ऐन लॉकडाऊन असताना नियुक्ती दिली आहे. तरीही महावितरण कंपनीनेही अद्याप जाहिरातीच्या नियुक्ती संदर्भात कोणतीही परिपत्रक जारी केले नाही. वरील प्रकरणात लक्ष कडू यांनी लक्ष घालून ऊर्जा मंत्री नितीन राऊत व महावितरणकडे पुढील प्रक्रिया करण्याचे आणि निवड झालेल्या ३२७ उमेदवारांच्या नियुक्ती विषयी चौकशी करून न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, युवा जिल्हाप्रमुख जगन काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मोतीलाल चव्हाण व प्रतिनिधी काशीद शेख उपस्थित होते.जाहिरातीची प्रकिया अंतिम टप्यात आहे. त्यानंतर ७ ते ८ महिने झाले तरी नियुक्ती देण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. महावितरण मध्ये नियुक्ती मिळेल या अपेक्षेने ऐन कोरोना सारख्या वैश्विक महामारी काळात अनेक उमेदवारांनी पूर्वीची नोकरी सोडली आहे त्यात अद्याप नियुक्ती करण्यात आली नसल्याने आर्थिक अडचण तसेच बेरोजगारीमुळे उमेदवार त्रस्त आहे.

टॅग्स :electricityवीजBachhu Kaduबच्चू कडू