शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उमेदवार लादणार नाही

By admin | Updated: August 25, 2016 00:51 IST

भाई जगताप : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आढावा बैठक

 नाशिक : येत्या जानेवारी-फेबु्रवारी २०१७मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवूनच उमेदवारी दिली जाईल. कोणताही उमेदवार स्थानिकांवर लादला जाणार नाही, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आमदार भाई जगताप यांनी केले.जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या आढावा बैठकीत आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कॉँग्रेस भवनात आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, निवृत्ती डावरे, श्याम तायडे, भाऊसाहेब बोरस्ते, सुनील आव्हाड, भास्करराव बनकर आदि उपस्थित होते. आमदार भाई जगताप यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या घटनेतील बदलानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निरीक्षक पाठविण्याचा निर्णय प्रदेश कॉँग्रेसने घेतला. जिल्ह्णातील १५ मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असून, ते ते निरीक्षक त्या त्या मतदारसंघात किमान दहा दिवस राहतील. त्यांच्या कामकाजावर पक्षाची करडी नजर राहील. निरीक्षकांनी त्या त्या तालुक्यात बूथ कमिट्यांपासून काम उभे करायचे आहे. पक्षाचे उमेदवारदेखील नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय पॅनलकडून अंतिम केले जातील. पक्षाकडून त्या त्या मतदारसंघात कोणताही उमेदवार वरून लादला जाणार नाही. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी राष्ट्रवादीने पक्षाचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र आगामी निवडणुकांमध्ये युतीला शह देण्यासाठी काही ठिकाणी आघाडी करण्याची गरज असल्याचे सांगितले. बैठकीस जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील, माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, निर्मला खर्डे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)