शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

कांदा निर्यातमूल्य तत्काळ रद्द करावे

By admin | Updated: June 20, 2014 01:21 IST

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करण्याची मागणी कॉँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावरून थेट ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा घेतलेला निर्णय कांदा उत्पादक विरोधी व शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारा असल्याचा आरोप करीत हे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करण्याची मागणी कॉँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, महाराष्ट्रात त्यातही नाशिक जिल्ह्णात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणावरील गारपिटीमुळे शेतकरी नैसर्गिक आपत्तीत हतबल झालेला असून, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नाही म्हणून चाळीत साठवून ठेवला होता. कांद्यावरील निर्यातमूल्य रद्द झालेले असताना आता पुन्हा ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन निर्यातमूल्य वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकात पैसे मिळेल व तो कर्ज फेडेल, असे चित्र नाही. त्यामुळे ही निर्यातमूल्य वाढ म्हणजे एकप्रकारे कांदा निर्यातबंदी असल्याचा आरोप आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी केला आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कांद्यावरील किमान निर्यातमूल्य ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारे कांदा निर्यातबंदीचाच निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा निर्णय आहे. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्यावरील ९०० डॉलर प्रतिमेट्रिक टन असलेले निर्यातमूल्य रद्द करण्याची मागणी केली होती, तेव्हा पवार यांनी कांद्यावरील निर्यातमूल्य संपूर्णपणे रद्द केले होते. आता पुन्हा निर्यातमूल्य वाढविल्याने या निर्णयाने शेती व्यवसाय संकटात सापडणार असून, या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे.त्याचप्रमाणे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनीही केंद्र शासनाच्या या निर्णयावर टीका केली असून, कांदा उत्पादकांसाठी कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येत असतानाच हा निर्यातमूल्य वाढीचा निर्णय म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणारा निर्णय असल्याचे सांगितले आहे. केंद्र शासनाला शेतकऱ्यांशी व कांदा उत्पादकांशी काही घेणे-देणे नसल्याचेच हे लक्षण असल्याचा आरोप पानगव्हाणे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)