शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातमूल्य तत्काळ रद्द करावे

By admin | Updated: June 20, 2014 01:21 IST

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करण्याची मागणी कॉँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

नाशिक : केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावरून थेट ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा घेतलेला निर्णय कांदा उत्पादक विरोधी व शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारा असल्याचा आरोप करीत हे निर्यातमूल्य तत्काळ रद्द करण्याची मागणी कॉँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, महाराष्ट्रात त्यातही नाशिक जिल्ह्णात अवकाळी पाऊस व मोठ्या प्रमाणावरील गारपिटीमुळे शेतकरी नैसर्गिक आपत्तीत हतबल झालेला असून, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नाही म्हणून चाळीत साठवून ठेवला होता. कांद्यावरील निर्यातमूल्य रद्द झालेले असताना आता पुन्हा ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन निर्यातमूल्य वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना कांदा पिकात पैसे मिळेल व तो कर्ज फेडेल, असे चित्र नाही. त्यामुळे ही निर्यातमूल्य वाढ म्हणजे एकप्रकारे कांदा निर्यातबंदी असल्याचा आरोप आमदार अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी केला आहे.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कांद्यावरील किमान निर्यातमूल्य ३०० डॉलर प्रतिमेट्रिक टन करण्याचा घेतलेला निर्णय हा एकप्रकारे कांदा निर्यातबंदीचाच निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय कांदा उत्पादकांवर अन्याय करणारा निर्णय आहे. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार नाशिक दौऱ्यावर आल्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्यावरील ९०० डॉलर प्रतिमेट्रिक टन असलेले निर्यातमूल्य रद्द करण्याची मागणी केली होती, तेव्हा पवार यांनी कांद्यावरील निर्यातमूल्य संपूर्णपणे रद्द केले होते. आता पुन्हा निर्यातमूल्य वाढविल्याने या निर्णयाने शेती व्यवसाय संकटात सापडणार असून, या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे.त्याचप्रमाणे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनीही केंद्र शासनाच्या या निर्णयावर टीका केली असून, कांदा उत्पादकांसाठी कधी नव्हे ते ‘अच्छे दिन’ येत असतानाच हा निर्यातमूल्य वाढीचा निर्णय म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणारा निर्णय असल्याचे सांगितले आहे. केंद्र शासनाला शेतकऱ्यांशी व कांदा उत्पादकांशी काही घेणे-देणे नसल्याचेच हे लक्षण असल्याचा आरोप पानगव्हाणे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)