शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

राज्य राखीव दलाला पाचारण

By admin | Updated: January 11, 2016 00:02 IST

पालखेड डावा कालवा : हितसंबंधांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी पालखेड विभागाने शनिवारी सांयकाळी राज्य राखीव दलालाला पाचारण केले. मात्र हा निर्णय आवर्तनाच्या पहिल्या दिवसापासून का केला नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य येवलेकरांकडून विचारला जात आहे. पोलीस बंदोबस्त वाढल्यावर पाणी गळतीत थोडीफार सुधारणा झाली असून राज्य राखीव दलाने अनेक ठिकाणचे डोंगळे बंद केले असून संबंधितांवर कारवाई न करता त्यांना समज देण्यात आली आहे. यामुळे येवला साठवण तलावात पाणी पडण्याचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. पालखेड डाव्या कालव्यातून होणाऱ्या पाणी चोरी संदर्भात लोकमतने ‘‘पाटातील पाणी नेले थेट शेततळ्यात’’ या आशयाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पालखेड विभागाने राज्यराखीव दलाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला.येवल्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालखेडचे आवर्तन सुटले असले तरी आज सातव्या दिवशी पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाने तळ देखील झाकलेला नाही. या परिस्थितीला संपूर्ण पणे कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनिधकृत उपसा कारणीभूत आहे. पाणीचोरी कायम राहिली तर येवल्याची तहान भागणे अशक्य आहे. शेतकऱ्यांशी संबधित प्रश्न असल्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून हस्तक्षेप करण्यास तयार नाही. त्यामुळे येवला शहरावरचे पाणी संकट गहिरे झाले आहे.१३ दिवसानंतरही येवलेकराना पाणी मिळालेले नाही. शहरात पिण्यासाठी देखील पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. पालखेड आवर्तन ४ जानेवारी पासून सुमारे ७५० क्युसेस ने सुरु झाले आहे. परंतु अद्याप येवलेकरांचा घसा कोरडाच आहे. येवले शहराला पाणी मिळण्यासाठी कमीत कमी १५० क्युसेस इतका वेग असणे गरजेचे आहे. तरच साठवण तलावात पाणी मिळू शकेल. रविवार सांयकाळी ६ वाजेपर्यत शहराच्या साठवण तलावात ५ दलघफू पाणी आले असल्याची माहिती आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे येवला साठवण तलावात तीन दिवसापासून पाणी येऊन सुद्धा साठवण तलावाने तळदेखील झाकला नाही. रविवारी पिंपळगाव परीसरातील ० ते ४१ किमी पर्यत ५०५ क्युसेस म्हणजेच ९१ किमी अंतरावर प्रतिदिन ४४ दलघफूने पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते; मात्र साखळी क्र मांक ७० मध्ये सुमारे १९ दलघफूने पुरवठा होत आहे. ७० ते ८५ मध्ये ९ दलघफूने पुरवठा होत आहे. येवला साठवण तलाव शनिवार सायंकाळ पावेतो केवळ ७०० क्युसेसने ( ६ दलघफू) पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. म्हणजेच मुखातून सोडलेल्या पाण्यात ० ते ९५ किमीपर्यंत १०० टक्क्यांपैकी फक्त ८.५ टक्के पाणी येवल्याला मिळत आहे. म्हणजे सुमारे ९१ टक्के पाणी गळती होत आहे. पालखेड विभागाच्या नियोजनानुसार ७५० दलघफू पाण्यात, सर्व प्रकारच्या आरक्षित पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन असताना सातव्या दिवशी सुमारे ५०० दलघफू पाणी खर्च करून केवळ येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात ५ दलघफू व मनमाड साठवण तलावात ९ दलघफू तर मनमाड रेल्वे साठी ५ दलघफू पाणी मिळाले आहे. मनमाड रेल्वे आणि मनमाड साठवण तलावातील पाणी शनिवार सायंकाळी बंद केले असतानादेखील येवला साठवण तलावात ७० क्युसेसने पाणीपुरवठा होत आहे. हा चिंतनाचा विषय आहे. निफाड ते विंचूर परिसरातील ४१ ते ८५ दरम्यान ४०८ क्युसेसने प्रतिदिन ३५.३६ दलघफू होणारा पाण्याचा व्यय हा पालखेड विभागात होतो. यासाठी योग्य ती कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी दाबात प्रगती न झाल्यास साठवण तलाव ५० दिवसातदेखील भरण्याची श्वाश्वती देता येणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आता आवर्तन आल्यानंतर ४० द.ल.घ.फू. पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. आगामी चार महिन्यानंतर पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होण्याचे स्पष्ट संकेत या आवर्तनादरम्यान स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)पालखेड विभागाने राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण केल्यानंतर रविवारी सायंकाळनंतर येवला साठवण तलावात वेगाने पाणी पोहोचू लागले.