शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

राज्य राखीव दलाला पाचारण

By admin | Updated: January 11, 2016 00:02 IST

पालखेड डावा कालवा : हितसंबंधांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी पालखेड विभागाने शनिवारी सांयकाळी राज्य राखीव दलालाला पाचारण केले. मात्र हा निर्णय आवर्तनाच्या पहिल्या दिवसापासून का केला नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य येवलेकरांकडून विचारला जात आहे. पोलीस बंदोबस्त वाढल्यावर पाणी गळतीत थोडीफार सुधारणा झाली असून राज्य राखीव दलाने अनेक ठिकाणचे डोंगळे बंद केले असून संबंधितांवर कारवाई न करता त्यांना समज देण्यात आली आहे. यामुळे येवला साठवण तलावात पाणी पडण्याचा वेग काही प्रमाणात वाढला आहे. पालखेड डाव्या कालव्यातून होणाऱ्या पाणी चोरी संदर्भात लोकमतने ‘‘पाटातील पाणी नेले थेट शेततळ्यात’’ या आशयाचे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पालखेड विभागाने राज्यराखीव दलाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला.येवल्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालखेडचे आवर्तन सुटले असले तरी आज सातव्या दिवशी पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाने तळ देखील झाकलेला नाही. या परिस्थितीला संपूर्ण पणे कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनिधकृत उपसा कारणीभूत आहे. पाणीचोरी कायम राहिली तर येवल्याची तहान भागणे अशक्य आहे. शेतकऱ्यांशी संबधित प्रश्न असल्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांची नाराजी पत्करून हस्तक्षेप करण्यास तयार नाही. त्यामुळे येवला शहरावरचे पाणी संकट गहिरे झाले आहे.१३ दिवसानंतरही येवलेकराना पाणी मिळालेले नाही. शहरात पिण्यासाठी देखील पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. पालखेड आवर्तन ४ जानेवारी पासून सुमारे ७५० क्युसेस ने सुरु झाले आहे. परंतु अद्याप येवलेकरांचा घसा कोरडाच आहे. येवले शहराला पाणी मिळण्यासाठी कमीत कमी १५० क्युसेस इतका वेग असणे गरजेचे आहे. तरच साठवण तलावात पाणी मिळू शकेल. रविवार सांयकाळी ६ वाजेपर्यत शहराच्या साठवण तलावात ५ दलघफू पाणी आले असल्याची माहिती आहे. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्याने येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे येवला साठवण तलावात तीन दिवसापासून पाणी येऊन सुद्धा साठवण तलावाने तळदेखील झाकला नाही. रविवारी पिंपळगाव परीसरातील ० ते ४१ किमी पर्यत ५०५ क्युसेस म्हणजेच ९१ किमी अंतरावर प्रतिदिन ४४ दलघफूने पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते; मात्र साखळी क्र मांक ७० मध्ये सुमारे १९ दलघफूने पुरवठा होत आहे. ७० ते ८५ मध्ये ९ दलघफूने पुरवठा होत आहे. येवला साठवण तलाव शनिवार सायंकाळ पावेतो केवळ ७०० क्युसेसने ( ६ दलघफू) पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. म्हणजेच मुखातून सोडलेल्या पाण्यात ० ते ९५ किमीपर्यंत १०० टक्क्यांपैकी फक्त ८.५ टक्के पाणी येवल्याला मिळत आहे. म्हणजे सुमारे ९१ टक्के पाणी गळती होत आहे. पालखेड विभागाच्या नियोजनानुसार ७५० दलघफू पाण्यात, सर्व प्रकारच्या आरक्षित पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन असताना सातव्या दिवशी सुमारे ५०० दलघफू पाणी खर्च करून केवळ येवला नगरपालिकेच्या साठवण तलावात ५ दलघफू व मनमाड साठवण तलावात ९ दलघफू तर मनमाड रेल्वे साठी ५ दलघफू पाणी मिळाले आहे. मनमाड रेल्वे आणि मनमाड साठवण तलावातील पाणी शनिवार सायंकाळी बंद केले असतानादेखील येवला साठवण तलावात ७० क्युसेसने पाणीपुरवठा होत आहे. हा चिंतनाचा विषय आहे. निफाड ते विंचूर परिसरातील ४१ ते ८५ दरम्यान ४०८ क्युसेसने प्रतिदिन ३५.३६ दलघफू होणारा पाण्याचा व्यय हा पालखेड विभागात होतो. यासाठी योग्य ती कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी दाबात प्रगती न झाल्यास साठवण तलाव ५० दिवसातदेखील भरण्याची श्वाश्वती देता येणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आता आवर्तन आल्यानंतर ४० द.ल.घ.फू. पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. आगामी चार महिन्यानंतर पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष होण्याचे स्पष्ट संकेत या आवर्तनादरम्यान स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)पालखेड विभागाने राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण केल्यानंतर रविवारी सायंकाळनंतर येवला साठवण तलावात वेगाने पाणी पोहोचू लागले.