शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

सी. ई. टी.चे संकेतस्थळ शेवटच्या तारखेलाही बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST

----------------------------------------------------------- ▪️११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात ११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह ...

-----------------------------------------------------------

▪️११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

देवगांव (तुकाराम रोकडे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या ११वी प्रवेश प्रकियेसाठी सामाईक परीक्षेचे अर्ज करताना मंडळाच्या संकेतस्थळ बंदीमुळे ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, संकेतस्थळाच्या अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा कमकुवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

दहावी म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. परंतु कोरोना काळामध्ये शाळा भरली नसल्याने केवळ मूल्यांकनाच्या आधारावर दहावीचा निकाल राज्यांमध्ये लागला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणातून परिवर्तन करून आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, यंदा ही परिस्थिती अगदीच वेगळी आहे.

दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर सीईटी परीक्षा दिनांक २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी ११वी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने सामाईक परीक्षेचे अर्ज भरण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे. दिनांक २६ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली होती. पहिल्या दिवशी संकेतस्थळ सुरू असल्याने काही जागरूक पालक आपल्या पाल्याचे अर्ज करू शकले. मात्र, त्यानंतर शेवटची तारीख आली असतानाही अजूनपर्यंत संकेतस्थळ पूर्ववत चालू नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले आहेत. अर्ज भरण्यासाठी अजून अवधी मिळावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११वी परीक्षेसंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि. २० जुलै रोजी सकाळी ११.३० पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि. २१ जुलैपासून बंद ठेवण्यात आली आहे, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

-----------------------

सीईटी परीक्षा अनिवार्य

जागतिक महामारी कोरोनामुळे शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेणे शक्य नसल्याने अंतर्गत मूल्यमापन पध्दतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असल्याने परीक्षेचे अर्ज सीईटीच्या संकेतस्थळावर भरावयाचे होते. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थीसंख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चित झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहे. मात्र, संकेतस्थळ बंद असून, अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

--------------------------

इंटरनेट सुविधा कोलमडली

जवळपास शंभर टक्के निकाल लागलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक प्रवेशानुसार कला, वाणिज्य व विज्ञान तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि इतर पदविका अभ्यासक्रमाचे दरवाजे उघडे आहेत. परंतु, या सर्व गोष्टी करत असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंटरनेट सुविधा कोलमडलेली आहे.

-------------------------

मुदतवाढ ०२ ऑगस्टपर्यंत...

११वी प्रवेशाकरिता सामाईक परीक्षेसाठी ग्रामीण भागांतून संकेतस्थळाच्या अडचणीमुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाहीत. ११वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेमधून प्रवेश निश्चिती असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.