शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

सी. ई. टी.चे संकेतस्थळ शेवटच्या तारखेलाही बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST

----------------------------------------------------------- ▪️११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात ११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह ...

-----------------------------------------------------------

▪️११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

११वी प्रवेश प्रक्रिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

देवगांव (तुकाराम रोकडे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या ११वी प्रवेश प्रकियेसाठी सामाईक परीक्षेचे अर्ज करताना मंडळाच्या संकेतस्थळ बंदीमुळे ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, संकेतस्थळाच्या अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा कमकुवत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

दहावी म्हटलं की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. परंतु कोरोना काळामध्ये शाळा भरली नसल्याने केवळ मूल्यांकनाच्या आधारावर दहावीचा निकाल राज्यांमध्ये लागला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणातून परिवर्तन करून आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, यंदा ही परिस्थिती अगदीच वेगळी आहे.

दहावीचा निकाल घोषित केल्यानंतर सीईटी परीक्षा दिनांक २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी ११वी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने सामाईक परीक्षेचे अर्ज भरण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे. दिनांक २६ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली होती. पहिल्या दिवशी संकेतस्थळ सुरू असल्याने काही जागरूक पालक आपल्या पाल्याचे अर्ज करू शकले. मात्र, त्यानंतर शेवटची तारीख आली असतानाही अजूनपर्यंत संकेतस्थळ पूर्ववत चालू नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसारख्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले आहेत. अर्ज भरण्यासाठी अजून अवधी मिळावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ व दि. २४ जून, २०२१ नुसार इ. ११वी परीक्षेसंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. सदर परीक्षेसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा दि. २० जुलै रोजी सकाळी ११.३० पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, तांत्रिक कारणास्तव सदर सुविधा दि. २१ जुलैपासून बंद ठेवण्यात आली आहे, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

-----------------------

सीईटी परीक्षा अनिवार्य

जागतिक महामारी कोरोनामुळे शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेणे शक्य नसल्याने अंतर्गत मूल्यमापन पध्दतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. मात्र, अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असल्याने परीक्षेचे अर्ज सीईटीच्या संकेतस्थळावर भरावयाचे होते. परीक्षा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थीसंख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चित झाल्याची माहिती विद्यार्थ्यांना पाठविण्यात येणार आहे. मात्र, संकेतस्थळ बंद असून, अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

--------------------------

इंटरनेट सुविधा कोलमडली

जवळपास शंभर टक्के निकाल लागलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक प्रवेशानुसार कला, वाणिज्य व विज्ञान तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे तांत्रिक प्रशिक्षण आणि इतर पदविका अभ्यासक्रमाचे दरवाजे उघडे आहेत. परंतु, या सर्व गोष्टी करत असताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंटरनेट सुविधा कोलमडलेली आहे.

-------------------------

मुदतवाढ ०२ ऑगस्टपर्यंत...

११वी प्रवेशाकरिता सामाईक परीक्षेसाठी ग्रामीण भागांतून संकेतस्थळाच्या अडचणीमुळे बहुतेक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाहीत. ११वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेमधून प्रवेश निश्चिती असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.