शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा वाणिज्यकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:30 IST

नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला विद्यार्थ्यांनी फारसे प्राधान्य दिले नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. नाशिक विभागातील सुमारे दीड लाख ...

नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला विद्यार्थ्यांनी फारसे प्राधान्य दिले नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. नाशिक विभागातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. या कल चाचणीचा अहवाल नुकताच समोर आला आहे.  शालेय शिक्षण विभाग, श्यामची आई फाउंडेशन, मानसशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने सदर कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. दहावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी मदत व्हावी किंबहुना त्यांना त्यांचा कल लक्षात यावा यासाठी विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेतली जाते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची होणारी धावाधाव थांबून त्यांना अभ्यासक्रम निवडीसाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच पालकांनादेखील मुलांमधील क्षमता लक्षात यावी यासाठी कल चाचणीचा उपयोग महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्र शासनाच्या महाकरिअर मित्र या पोर्टलवर कल चाचणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, यानुसार राज्यभरातील विद्यार्थ्यांचा कल समोर आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा त्यांच्या आवडीचे क्षेत्र आणि उपलब्ध संधी यांची संपूर्ण माहिती पाहू शकतील. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओजदेखील विद्यार्थी पोर्टलवर पाहू शकतात. विविध विषयांवरील लेखही वाचू शकतील.प्रत्यक्ष प्रवेशाला खरे चित्र होणार स्पष्टविद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्राकडे आहे याची जुजबी माहिती पालकांना व्हावी आणि पालकांना त्याच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता आपल्या मुला-मुलीचा काय शिकण्याकडे कल आहे याची जाणीव पालकांना व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने सदर कल चाचणी परीक्षा घेतली जाते. अशाप्रकारचा कल दिसत असला तरी प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी कोणत्या शाखेला प्रवेश घेतात यावरही अभ्यासक्रमाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्तास राज्यात सर्वत्र वाणिज्यचा बोलबाला असल्याचे अहवालावरून दिसते.  राज्यभरातून घेण्यात आलेल्या या कल चाचणीत विद्यार्थ्यांचा कल जाहीर करताना त्यांच्यासाठी शासनाच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमाची माहितीदेखील देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जवळपास १९००० शासन मान्य कॉलेजेसचे ८०००० हून अधिक शैक्षणिक पर्यायांची माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अशा विद्यार्थ्यांना यामुळे स्वत:चे करिअर निवडण्याची समान संधी मिळू शकते.   राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या नऊ विभागातून सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातून कल चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १लाख ५० हजार ६८२ इतकी होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिक