शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा वाणिज्यकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:30 IST

नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला विद्यार्थ्यांनी फारसे प्राधान्य दिले नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. नाशिक विभागातील सुमारे दीड लाख ...

नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला विद्यार्थ्यांनी फारसे प्राधान्य दिले नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. नाशिक विभागातील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. या कल चाचणीचा अहवाल नुकताच समोर आला आहे.  शालेय शिक्षण विभाग, श्यामची आई फाउंडेशन, मानसशास्त्र विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने सदर कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. दहावीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी मदत व्हावी किंबहुना त्यांना त्यांचा कल लक्षात यावा यासाठी विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेतली जाते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची होणारी धावाधाव थांबून त्यांना अभ्यासक्रम निवडीसाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच पालकांनादेखील मुलांमधील क्षमता लक्षात यावी यासाठी कल चाचणीचा उपयोग महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्र शासनाच्या महाकरिअर मित्र या पोर्टलवर कल चाचणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, यानुसार राज्यभरातील विद्यार्थ्यांचा कल समोर आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अति दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा त्यांच्या आवडीचे क्षेत्र आणि उपलब्ध संधी यांची संपूर्ण माहिती पाहू शकतील. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांचे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनात्मक व्हिडीओजदेखील विद्यार्थी पोर्टलवर पाहू शकतात. विविध विषयांवरील लेखही वाचू शकतील.प्रत्यक्ष प्रवेशाला खरे चित्र होणार स्पष्टविद्यार्थ्यांची आवड कोणत्या क्षेत्राकडे आहे याची जुजबी माहिती पालकांना व्हावी आणि पालकांना त्याच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता आपल्या मुला-मुलीचा काय शिकण्याकडे कल आहे याची जाणीव पालकांना व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने सदर कल चाचणी परीक्षा घेतली जाते. अशाप्रकारचा कल दिसत असला तरी प्रत्यक्षात प्रवेशाच्या वेळी विद्यार्थी कोणत्या शाखेला प्रवेश घेतात यावरही अभ्यासक्रमाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तूर्तास राज्यात सर्वत्र वाणिज्यचा बोलबाला असल्याचे अहवालावरून दिसते.  राज्यभरातून घेण्यात आलेल्या या कल चाचणीत विद्यार्थ्यांचा कल जाहीर करताना त्यांच्यासाठी शासनाच्या विविध शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमाची माहितीदेखील देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जवळपास १९००० शासन मान्य कॉलेजेसचे ८०००० हून अधिक शैक्षणिक पर्यायांची माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील अशा विद्यार्थ्यांना यामुळे स्वत:चे करिअर निवडण्याची समान संधी मिळू शकते.   राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या नऊ विभागातून सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातून कल चाचणी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १लाख ५० हजार ६८२ इतकी होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रeducationशैक्षणिक