शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यातील बसस्थानकेच अस्वच्छतेचे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:17 IST

कोविड विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बसस्थानके, आगार तसेच बससेची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असतानाही राज्यातील अनेक स्थानकांमध्ये स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याचे निरीक्षण मुख्यालयानेच नोंदविले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्याने आता राज्यात सर्वत्र १ डिसेंबरपासून बसस्थानके आणि बसेसची विशेष स्वच्छता केली जाणार आहे.

ठळक मुद्देनाराजी : एस.टी. महामंडळानेच नोंदविले निरीक्षण

नाशिक : कोविड विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बसस्थानके, आगार तसेच बससेची नियमित स्वच्छता करणे आवश्यक असतानाही राज्यातील अनेक स्थानकांमध्ये स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याचे निरीक्षण मुख्यालयानेच नोंदविले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्याने आता राज्यात सर्वत्र १ डिसेंबरपासून बसस्थानके आणि बसेसची विशेष स्वच्छता केली जाणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी बसस्थानकावर अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. बसस्थानके, बसेस आणि आगार स्वच्छ असणेदेखील महत्त्वाचे असताना त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने महामंडळाविषयी प्रवाशांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे. याबाबतची गंभीर दखल महामंडळाने घेतली असून, सर्वच स्थानकांवर स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रवाशांना महामंडळाविषयी निर्माण झालेली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी येत्या १ ते १५ डिसेंबर या कालावधीत बसस्थानके, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, प्रतीक्षालये, उपाहारगृहे स्वच्छ करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. सद्यस्थितीत कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छता करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्राधान्याने स्वच्छता करण्याचे फर्मान राज्यातील सर्वच विभाग नियंत्रणकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार आता बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची जाणीव करून द्यावी, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात यावेत, स्थानकात स्वच्छतेचा संदेश देणारे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

--इन्फो--

-- असे करणार नियोजन--

वाहनतळाचा परिसर किमान दोन वेळेस स्वच्छ करण्यात येणार आहे, खासगी वाहनांना प्रतिबंध करून गर्दी कमी करण्यात यावी, आवारातील रिकाम्या बाटल्या, कागद उचलण्यात यावेत, पिण्याची पाण्याची टाकी स्वच्छ करावी, नळाची दुरुस्ती करण्यात यावी, बसस्थानकातील फलाटे नियमित स्वच्छ करावीत, प्रसाधनगृहे, चालक-वाहकांचे विश्रांतीगृहे स्वच्छ करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. स्थानकावर असलेल्या प्रत्येक कक्षाचे सॅनिटायझेन करण्यावर भर देण्यात येणार आहे. विभाग नियंत्रकांना या सर्व स्वच्छतेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य