शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

बैल झाले महाग, सुयोग्य जोड्या मिळणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:19 IST

देवगांव : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्‍यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दुपटीने वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हैराण : देवगाव परिसरात मशागतीची कामे खोळंबली

देवगांव : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्‍यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दुपटीने वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे.पुढील महिन्यात खरीप हंगाम सुरू होत आहे. हंगामापूर्वी मशागतीच्या कामांसाठी बैलांची मोठी गरज असते. यासाठी शेतकरी गुढीपाडव्यानंतर बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करतात. यंदा गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व प्रकारचे बाजार बंद आहेत. याचा फटका प्रामुख्याने जनावरांच्या बाजाराला अधिक बसला आहे. बैलांची आवश्‍यकता असलेले शेतकरी बाजार उपलब्ध नसल्याने वैयक्तिक स्तरावर शोध घेत आहेत. चांगल्या दर्जाचे, नामवंत जातीचे बैल सहजपणे मिळणे कठीण झालेले आहे.खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोड्यांचे दर सव्वा ते दीडपट वाढले आहेत. गेल्यावर्षी ४० हजारात मिळणारी जोडी ६० ते ६५ हजार रुपये देऊनही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात प्रत्येक तालुक्यात एक ते दोन मोठे जनावर बाजार आहेत.आठवड्याला भरणाऱ्या या बाजारांमध्ये वर्षभर विविध जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. साधारणतः एप्रिल महिन्यापासून पेरणीपर्यंत बैलजोड्यांची विक्री अधिक होत असते. सध्या बाजारच बंद असल्याने, या बाजारांशी निगडीत इतरही व्यवहार ठप्प झालेले आहेत.मशागतीत अडचणीयंदाच्या हंगामात शेतीच्या कामांना परवानगी दिलेली असली तरी अनेक ठिकाणी ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यात अडचणी आहेत. वेगाने मशागत होण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढल्याने यंदा मशागतीच्या दरांमध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. छोटे शेतकरी बैलजोड्यांच्या साह्याने शेतीतील कामे करतात. बाजारांअभावी बैलजोड्या मिळत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे.

बाजार बंदचे परिणाम...▪️चांगले बैल मिळणे कठीण▪️बैलजोड्यांचे दर दीड ते दुप्पट वाढले▪️मध्यस्थांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक▪️बैलजोड्या शोधण्यासाठी धावपळ▪️बाजार बंदमुळे बाजार समित्यांचे उत्पन्न बुडाले▪️बैलजोडीचा दर साधारणतः ४० हजारांपासून सुरू▪️जास्तीत जास्त ८० हजार ते १ लाखापर्यंत दर▪️जनावरांच्या बाजारांवर अवलंबून असलेले व्यवसायही ठप्प.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी