शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

निवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल ...

ठळक मुद्देसुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने वीजबिलांचा भरणा केलेला नसल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे मोबाइल टॉवर व दूरध्वनी नियंत्रण केंद्रे (टेलिफोन एक्स्चेंज) बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर वीजबिलांचा भरणा : जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने यंत्रणा होणार पूर्ववतनिवडणुकीमुळे बीएसएनएलचे बंद टॉवर होणार सुरूविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेतील समन्वय आणि संपर्कात अडसर निर्माण होत असल्याने ही सर्व केंद्रे पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यातील सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.ग्रामीण भागात निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापासून ते थेट मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बीएसएनएलची मोबाइल अथवा दूरध्वनी सेवा अतिशय महत्त्वाची ठरते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएल आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करतानाही बीएसएनएलला उशीर होत आहे. त्यातच जिल्हाभरातील सुमारे ८० ते ८५ मोबाइल टॉवरचे आणि १२५ ते १५० एक्सेंड अनियमित बिल भरण्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बंद होते.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत यंत्रणेशी समन्वय साधताना अडसर निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून महावितरण आणि बीएसएनएल या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने मोबाइल टॉवर व एक्स्चेंज सेंटरचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात बीएसएनएलकडून काही प्रमुख केंद्रांचा व टॉवरचा वीजबिल भरणा केला जात असून प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ मोबाइल टॉवर आणि २७ एक्स्चेंज पुन्हा सुरू करण्यात आले असून, उर्वरित केंद्रेही लवकरच सुरू होणार आहेत. खंडित वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास प्रारंभबीएसएनएलच्या थकीत वीजबिलांमुळे एमएसईबीतर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे मोबाइल टॉवर व टेलिफोन एक्स्चेंजचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता; मात्र याचा थेट निवडणूक यंत्रणेवर परिणाम झाल्याने अखेर राज्य शासनाने निवडणूक काळात एमएसईबीला बीएसएनएल आणि एमटीएनएलचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलInternetइंटरनेट