शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

By धनंजय वाखारे | Updated: November 22, 2023 17:38 IST

सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

विक्रम पासलकर

गोंदे दुमाला (नाशिक) : मराठा आरक्षणाला सत्तेतील काही मंत्री व त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या दहा पंधरा जणांच्या टोळीचा विरोध आहे. मराठा समाज व ओबीसी बांधव यांच्यातील वातावरण दूषित केले जात आहे. परंतु तुम्ही कितीही मांड्या ठोका, मराठा समाज दंड थोपटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी २४ डिसेंबरपूर्वी दिलेला शब्द पाळल्यास कुठल्याही आंदोलनाची गरज भासणार नाही. सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२२) इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

इगतपुरी, सिन्नर, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शेणित येथे आयोजित सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी घणाघाती भाषण करत सांगितले, राज्यभरातील अखंड मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आलाच तर आपली दुकाने बंद होतील आणि मराठा समाज डोइजड होईल या भीतीने अनेकांचा पोटशूळ उठला आहे. त्यासाठीच त्यांनी एका साहेबाला पुढे केले आहे. ऊठसूठ आमच्यावर खालची पातळी सोडून दूषित वातावरण निर्माण केले जात आहे. पण आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला. आजपर्यंत राज्यभरात सुमारे ३२ लाख मराठ्यांच्या ओबीसी नोंदी शासकीय पातळीवर आढळून आल्या आहेत. शासनाचे हे काम प्रगतिपथावर सुरु आहे. ज्यांच्या नोंदी आढळत नाहीत त्यांनी बिथरुन जाऊ नये. आपल्यात खुळपाट घालायचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र आपली एकजुट अशीच अभेद्य ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या पूर्वी स्वाती कदम व अन्य महिलांनी मनोगत व्यक्त केले.

जरांगेंकडून शांततेची शपथ 

या जनसभेसाठी तालुक्यातील गावांनी मोढा जाहीर केला होता. शेतकऱ्यांनी शेतीकामे बंद ठेवून सभेला हजेरी लावली. सभास्थळी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. दि. १ डिसेंबरपासून राज्यभर गावोगावी साखळी उपोषण सुरु होणार आहे.

शांततेच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होणार नाही व तेढ निर्माण होणार नाही अशी शपथ जरांगे पाटील यांनी यावेळी जनसभेला दिली.इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे सभास्थळी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी दानशूरांनी जेवण, नाश्ता, पाणी व वैद्यकीय व्यवस्था केली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण