शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

By धनंजय वाखारे | Updated: November 22, 2023 17:38 IST

सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

विक्रम पासलकर

गोंदे दुमाला (नाशिक) : मराठा आरक्षणाला सत्तेतील काही मंत्री व त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या दहा पंधरा जणांच्या टोळीचा विरोध आहे. मराठा समाज व ओबीसी बांधव यांच्यातील वातावरण दूषित केले जात आहे. परंतु तुम्ही कितीही मांड्या ठोका, मराठा समाज दंड थोपटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी २४ डिसेंबरपूर्वी दिलेला शब्द पाळल्यास कुठल्याही आंदोलनाची गरज भासणार नाही. सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२२) इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

इगतपुरी, सिन्नर, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शेणित येथे आयोजित सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी घणाघाती भाषण करत सांगितले, राज्यभरातील अखंड मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आलाच तर आपली दुकाने बंद होतील आणि मराठा समाज डोइजड होईल या भीतीने अनेकांचा पोटशूळ उठला आहे. त्यासाठीच त्यांनी एका साहेबाला पुढे केले आहे. ऊठसूठ आमच्यावर खालची पातळी सोडून दूषित वातावरण निर्माण केले जात आहे. पण आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला. आजपर्यंत राज्यभरात सुमारे ३२ लाख मराठ्यांच्या ओबीसी नोंदी शासकीय पातळीवर आढळून आल्या आहेत. शासनाचे हे काम प्रगतिपथावर सुरु आहे. ज्यांच्या नोंदी आढळत नाहीत त्यांनी बिथरुन जाऊ नये. आपल्यात खुळपाट घालायचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र आपली एकजुट अशीच अभेद्य ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या पूर्वी स्वाती कदम व अन्य महिलांनी मनोगत व्यक्त केले.

जरांगेंकडून शांततेची शपथ 

या जनसभेसाठी तालुक्यातील गावांनी मोढा जाहीर केला होता. शेतकऱ्यांनी शेतीकामे बंद ठेवून सभेला हजेरी लावली. सभास्थळी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. दि. १ डिसेंबरपासून राज्यभर गावोगावी साखळी उपोषण सुरु होणार आहे.

शांततेच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होणार नाही व तेढ निर्माण होणार नाही अशी शपथ जरांगे पाटील यांनी यावेळी जनसभेला दिली.इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे सभास्थळी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी दानशूरांनी जेवण, नाश्ता, पाणी व वैद्यकीय व्यवस्था केली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण