शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

By धनंजय वाखारे | Updated: November 22, 2023 17:38 IST

सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

विक्रम पासलकर

गोंदे दुमाला (नाशिक) : मराठा आरक्षणाला सत्तेतील काही मंत्री व त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या दहा पंधरा जणांच्या टोळीचा विरोध आहे. मराठा समाज व ओबीसी बांधव यांच्यातील वातावरण दूषित केले जात आहे. परंतु तुम्ही कितीही मांड्या ठोका, मराठा समाज दंड थोपटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी २४ डिसेंबरपूर्वी दिलेला शब्द पाळल्यास कुठल्याही आंदोलनाची गरज भासणार नाही. सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२२) इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

इगतपुरी, सिन्नर, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शेणित येथे आयोजित सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी घणाघाती भाषण करत सांगितले, राज्यभरातील अखंड मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आलाच तर आपली दुकाने बंद होतील आणि मराठा समाज डोइजड होईल या भीतीने अनेकांचा पोटशूळ उठला आहे. त्यासाठीच त्यांनी एका साहेबाला पुढे केले आहे. ऊठसूठ आमच्यावर खालची पातळी सोडून दूषित वातावरण निर्माण केले जात आहे. पण आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला. आजपर्यंत राज्यभरात सुमारे ३२ लाख मराठ्यांच्या ओबीसी नोंदी शासकीय पातळीवर आढळून आल्या आहेत. शासनाचे हे काम प्रगतिपथावर सुरु आहे. ज्यांच्या नोंदी आढळत नाहीत त्यांनी बिथरुन जाऊ नये. आपल्यात खुळपाट घालायचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र आपली एकजुट अशीच अभेद्य ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या पूर्वी स्वाती कदम व अन्य महिलांनी मनोगत व्यक्त केले.

जरांगेंकडून शांततेची शपथ 

या जनसभेसाठी तालुक्यातील गावांनी मोढा जाहीर केला होता. शेतकऱ्यांनी शेतीकामे बंद ठेवून सभेला हजेरी लावली. सभास्थळी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. दि. १ डिसेंबरपासून राज्यभर गावोगावी साखळी उपोषण सुरु होणार आहे.

शांततेच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होणार नाही व तेढ निर्माण होणार नाही अशी शपथ जरांगे पाटील यांनी यावेळी जनसभेला दिली.इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे सभास्थळी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी दानशूरांनी जेवण, नाश्ता, पाणी व वैद्यकीय व्यवस्था केली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण