शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पूरपाण्याने शेती ओलिताखाली आणा

By admin | Updated: April 4, 2017 00:59 IST

झोडगे :मोसम नदीच्या पूरपाण्याने दहिकुटे धरण भरून सिंचनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे सुवर्णा देसाई यांनी केली

झोडगे : मोसम साळ कालवा दुरुस्त करून मोसम नदीच्या पूरपाण्याने दहिकुटे धरण भरून सिंचनाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे पंचायत समिती सदस्य सुवर्णा देसाई यांनी केली.यावेळी विजय देसाई, सचिन देसले, योगेश देसले, भटू जगताप, किशोर मोरे, सुनील निकम, जळकूचे गोरख पवार, मुकुंद गायकवाड, सुधाकर राजोळे, अनिल मगर आदिंचा शिष्टमंडळात समावेश होता. सध्या माळमाथा परिसरात पाणीटंचाई जाणवत असून, सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. मात्र पाण्याअभावी शेती ओस पडली आहे. मोसम नदीचे वाहून जाणारे पूरपाणी मोसम साळ कालव्याद्वारे दहिकुटे धरणात पोहोचविण्यात येते. परंतु सदरचा कालवा हा अनेक वर्षांपासून दुरुस्त न केल्यामुळे कालव्यात गाळ, झाडे, झुडपे वाढल्यामुळे पूरपाणी पूर्ण क्षमतेने धरणापर्यंत पोहोचत नाही. सदर कालवा १५ हजार २०० कि.मी. पर्यंत डिझाईनप्रमाणे यंत्राने दुरुस्त होऊन भरून द्यावे. त्यामुळे दहिकुटे धरणाची क्षमता १०० दलघफू पाण्याचा फायदा सायने, दहिकुटे, चिखलओहोळ, देवारपाडे, जळकू व झोडगे येथील शेतकऱ्यांची ६०० हेक्टर शेती ओलिताखाली येईल म्हणून दहिकुटे धरण पूर्ण क्षमतेने भरून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. झोडगे येथील धनदाई माता मंदिराचा एक कि.मी.चा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही. भिलकोट ते गुगळवाड रस्ता दुरुस्तीची मागणीही निवेदनाद्वारे केली.दरम्यान, झोडगे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भिकनराव देशमुख, सचिव धर्मराज सोनवणे, हिम्मतराव देसले, हिलाल देसले, मधुकर देवरे या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी केली. यावेळी भाजपाचे लकी गिल उपस्थित होते. (वार्ताहर)