शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणा : ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:27 IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्देसिन्नर : तालुका कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय

सिन्नर : तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.भ्रष्टाचारी अधिकाºयांमुळे सर्वसामान्य माणसांचे काम मार्गी लागणे मुश्कील झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा भ्रष्टाचारी अधिकाºयांचा बंदोबस्त जिल्हास्तरीय अधिकाºयांनी तत्काळ करावा, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या आशयाचे पत्र राज्याचे महसूलमंत्र्यांना पाठवण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.सिन्नर तालुक्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीमधील सर्व सदस्य बरखास्त करून नवीन सदस्यांची शिफारस बैठकीत करण्यात आली. प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुदाम सांगळे, राजाभाऊ गोळेसर यांच्यासह ज्येष्ठांना जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेण्यात यावे, अशी शिफारस यावेळी करण्यात आली. सिन्नर शहरांमध्ये पाण्याचे नियोजन कोलमडले असून, नगर परिषदेतील सत्ताधाºयांनी नियोजन करावे. आजी व माजी आमदारांनी मतभेद बाजूला ठेवून नगर परिषदेची पाणी योजना पूर्णत्वास नेऊन उपाययोजना करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मीना देशमुख, शहर महिला अध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका समन्वय उदय जाधव, अश्फाक शेख, सिन्नर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, जाकीर भाई शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.नुकसानभरपाईची मागणीअवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने आदेश देऊनही व्यवस्थित पंचनामे न करता थातूरमातूर पद्धतीने सरकारला प्रस्ताव पाठविले आहेत. संपूर्ण शेतकºयांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नसून त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, असा ठरावही बैठकीत करण्यातआला.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण