शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणा : ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:27 IST

भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्देसिन्नर : तालुका कॉँग्रेस कमिटीच्या बैठकीत घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय

सिन्नर : तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याच्या मागणीच्या ठरावासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका अध्यक्ष विनायक सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामगृहात कॉँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.भ्रष्टाचारी अधिकाºयांमुळे सर्वसामान्य माणसांचे काम मार्गी लागणे मुश्कील झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा भ्रष्टाचारी अधिकाºयांचा बंदोबस्त जिल्हास्तरीय अधिकाºयांनी तत्काळ करावा, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या आशयाचे पत्र राज्याचे महसूलमंत्र्यांना पाठवण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.सिन्नर तालुक्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीमधील सर्व सदस्य बरखास्त करून नवीन सदस्यांची शिफारस बैठकीत करण्यात आली. प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुदाम सांगळे, राजाभाऊ गोळेसर यांच्यासह ज्येष्ठांना जिल्हा काँग्रेस कमिटीवर घेण्यात यावे, अशी शिफारस यावेळी करण्यात आली. सिन्नर शहरांमध्ये पाण्याचे नियोजन कोलमडले असून, नगर परिषदेतील सत्ताधाºयांनी नियोजन करावे. आजी व माजी आमदारांनी मतभेद बाजूला ठेवून नगर परिषदेची पाणी योजना पूर्णत्वास नेऊन उपाययोजना करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.या बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर तालुका महिला अध्यक्ष मीना देशमुख, शहर महिला अध्यक्ष रत्नमाला मोकळ, तालुका समन्वय उदय जाधव, अश्फाक शेख, सिन्नर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, जाकीर भाई शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.नुकसानभरपाईची मागणीअवकाळी पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने आदेश देऊनही व्यवस्थित पंचनामे न करता थातूरमातूर पद्धतीने सरकारला प्रस्ताव पाठविले आहेत. संपूर्ण शेतकºयांना योग्य प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली नसून त्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी, असा ठरावही बैठकीत करण्यातआला.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण