शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

कादवा नदीवरील पुल दुरुस्तीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:58 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे.

ठळक मुद्देलखमापूर : प्रवासी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे.कादवा नदीवरील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा पुल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून लखमापूर, कादवा कारखाना, वणी तसेच अन्य गावांना जाण्यासाठी म्हेळुस्केकरांना प्रवास करावा लागतो. परंतु पावसाळ्यात पुर आणि सतत प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक, प्रवासी वर्गाची कायम वर्दळ या पुलाला आजारपण प्राप्त करणारी ठरली होती.या पुलावर अत्यंत मधोमध मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवासी वर्गाला या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पावसाळ्यात कादवा नदीला करजंवण धरणांचे पाणी कायम सोडले जात असल्याने ह्या पुलाला पुराचे पाणी कायम लागलेले असते. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणारे विद्यार्थी अनेक संकटांना तोंड देऊन या पुलावरून प्रवास करीत आहेत.अनेक वेळा निवेदन देऊन ही या पुलांच्या समस्यांकडे कोणीही लक्ष्य दिले नाही. खासदार भारती पवार, दिंडोरी तालुक्याचे आमदार नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य छाया गोतरणे यांना नवीन उपसरपंच योगेश बर्डे यांनी या पुलाची समस्या पहाण्यासाठी निमंत्रण दिले व पुलाचे आजार पण दुर झाले.म्हेळुस्के ग्रामपंचायतीने याकामी वेळोवेळी आता नव्याने पाठपुरावा केल्याने या पुलाला समस्या मुक्तीचा मार्ग मिळाला आहे. या कामी म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे, ग्रामपंचायत सदस्य, दत्तू शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष माधव शिंदे, हरी बर्डे, गोटीराम बर्डे, सुनील गांगुर्डे, मोनाली वायकांडे, पुनाबाई गांगोडे, राजेंद्र बर्डे, काळू बर्डे, संजय गांगोडे, शरद कराटे, भिकन महाराज वक्ते, शांताराम पगार, आण्णा पगार, नामदेव गांगोडे आदी उपस्थित होते.कोट...हा पुल प्रवासी वर्गाला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा पुल बायपास म्हणून ही काही वेळेस वापरला जातो. परंतु हा पुल वाहतुकीसाठी अत्यंत धशेक्याचा वाटू लागल्याने त्याच्या दुरुस्तीसाठक्ष वेळोवेळी दिलेल्या निवेदनांला केराची टोपली पाहावी लागली. परंतु म्हेळुस्के ग्रामपंचायतीने यासाठी आता पुढाकार घेऊन या पुलाचे काम हाती घेतल्याने तालुक्यातील जनतेसमोर एक विकास कामांचा आदर्श निर्माण केला आहे......योगेश बर्डे, उपसरपंच, म्हेळुस्के ता. दिंडोरी. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासgram panchayatग्राम पंचायत