शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

विल्होळीच्या तलावाला मोठे भगदाड

By श्याम बागुल | Updated: September 9, 2018 16:49 IST

नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी ...

ठळक मुद्देपाण्याची गळती : पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता

नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. तलाव अनेक वर्षे जुना असून, तो बांधल्यापासून त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अलीकडेच पावसाळ्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या तलाव्याच्या खिंडीला मोठे भगदाड पडले असून, आजूबाजूलाही खड्डे पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांनी या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना कळविले असून, लवकरात लवकर तलावाची गळती थांबवावी अन्यथा तलावातील सर्व पाणी संपेल व ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी तलावाची पाहणी केली असून, त्याचे फोटो काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही कामास सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक