शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीच्या तलावाला मोठे भगदाड

By श्याम बागुल | Updated: September 9, 2018 16:49 IST

नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी ...

ठळक मुद्देपाण्याची गळती : पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता

नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार आहे.गावालगत असलेल्या या तलावातून वर्षभर आजूबाजूच्या शेतजमिनीला तसेच गावाला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. तलाव अनेक वर्षे जुना असून, तो बांधल्यापासून त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यात आलेली नाही. अलीकडेच पावसाळ्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने या तलाव्याच्या खिंडीला मोठे भगदाड पडले असून, आजूबाजूलाही खड्डे पडून पाण्याची गळती सुरू झाल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांनी या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना कळविले असून, लवकरात लवकर तलावाची गळती थांबवावी अन्यथा तलावातील सर्व पाणी संपेल व ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी तलावाची पाहणी केली असून, त्याचे फोटो काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही कामास सुरुवात झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक