शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विकासकामांच्या स्थगितीमुळे कोट्यवधींच्या कामांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 19:10 IST

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणार नाही,

ठळक मुद्देमनपा, जि.प. : शासनाकडे निधी परत पाठविण्याची तयारी १६ कामांचा नऊ कोटी रुपयांचा निधी पालिकेच्या तिजोरीत पडून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने यापूर्वीच्या सरकारने मंजूर केलेल्या विकासकामे व योजनांचा आढावा घेतानाच ज्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही अशी कामे स्थगित करून त्यासाठीचा निधी परत मागविल्याने नाशिक महापालिका व जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या शेकडो कोटीच्या कामांना ब्रेक लागला आहे. यातील अनेक कामांचा लोकप्रतिनिधींनीच पाठपुरावा करून त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता, त्यांनादेखील धक्का बसला आहे.

राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. या सरकारने भाजप सरकारच्या काळातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेऊन त्यांना स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जाहीर चर्चा होताच सरकारने कोणतेही विकासकामे रद्द अथवा स्थगित केले जाणार नाही, असा खुलासा केला मात्र त्याच दिवशी विशेष पत्राद्वारे नगरविकास व ग्रामविकास विभागामार्फत केल्या जाणाºया कामांना स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांना पाठविले आहे. त्यानुसार नगरविकास विभागाने महापालिकेकडून शासकीय निधीतून केल्या जाणाºया कामांची माहिती मागविली आहे. या आदेशानुसार नाशिक महापालिकेने उद्यान विभागातील १६ कामांची माहिती शासनाला सादर करण्यात आली असून, महापालिकेकडे या कामांचा नऊ कोटींचा निधी पडून आहे. नगरविकास विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना पायाभूत आणि मूलभूत सोयी सुविधा तसेच विविध विकासकामांकरिता विविध योजनेअंतर्गत विशेष अनुदान दिले जाते. नाशिक महापालिकेलाही दरवर्षी शासनाकडून पाणीपुरवठा, बांधकाम, मलनिस्सारण तसेच उद्यान विभागास अनुदान प्राप्त होत असते. अशा स्वरूपाचे महापालिकेच्या उद्यान विभागातील २४ कामांना २०१९-२० या वर्षासाठी विशेष अनुदान प्राप्त झाले होते. यात नाशिकरोड आणि पंचवटी विभागातील उद्यानांच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. २४ कामांपैकी १६ ते १७ कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे सादर केले होते. ही मंजुरी मिळण्यापूर्वीच शासनाच्या नगरविकास विभागाने त्याविषयी माहिती मागवून पुढील आदेश येईपर्यंत कार्यारंभ आदेश न देण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित १६ कामांचा नऊ कोटी रुपयांचा निधी पालिकेच्या तिजोरीत पडून आहे, तर जिल्हा परिषदेच्याही शेकडो कोटीच्या कामांना यामुळे ब्रेक लागला आहे. जनसुविधा योजनेंतर्गत शासनाकडून ग्रामपंचायतींना रस्ते, पाणी, गटार, स्मशानभूमी, पथदीप आदी जनसुविधेची कामे करण्याठी कोट्यवधी रुपये आठ महिन्यांपूर्वी उपलब्ध करून दिले होते, यातील काही कामे सुरू झाली असून, जी कामे सुरू झालेली नाहीत व त्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेली नाहीत अशी कामे तत्काळ थांबवून त्याचा निधी शासनाने परत मागविल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जवळपास शंभर कोटींच्या आसपास निधी शासनाला परत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :Governmentसरकारnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका