शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाडेवाढी विरोधात नाशिकला व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:09 IST

नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून

ठळक मुद्देबैठक निष्फळ : बाजारभाव कोसळल्याने शेतकरी संतप्त १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीने व्यापारी गाळ्यांचे भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या व्यापा-यांनी बुधवारी अचानक लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी तीन तास फळभाज्यांचे लिलाव ठप्प झाले. व्यापा-यांच्या या पावित्र्याने दुपारी बाजारसमितीत संचालक व व्यापा-यांची संयुक्त बैठक घेण्यात आली परंतु ती निष्फळ ठरल्याने उशीराने लिलाव सुरू झाल्यामुळे जिल्हाभरातून बाजारसमितीत शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतक-यांचे हाल होवून बाजारभाव कोसळल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.नाशिक उत्पन्न बाजारसमितीत काही वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाने सुमारे दीडशेहून अधिक तात्पुरते गाळे व्यापारी वर्गाला भाड्याने दिले असून, जागा समान असली तरी भाडेवाढ वार्षिक चार ते साठ हजार रुपये घेतले जाते. मात्र सदर भाडे हे कमी असल्याचे बाजार समितीच्या लक्षात आल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून १०० चौरस फुटाला प्रति दिन ५० रुपये या प्रमाणे व्यापा-यांना भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही व्यापा-यांनी विरोध दर्शविल्याने व्यापारी व बाजारसमिती यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच दरम्यान बुधवारी व्यापा-यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने सकाळी सुमारे तीन तास लिलाव प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल लिलावासाठी घेवून आलेल्या शेतक-यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, संचालक जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, प्रवीण नागरे यांनी व्यापाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आलीा. त्यात बाजार समितीने गाळे भाडेवाढीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला तर व्यापा-यांनी त्यास विरोध दर्शविल्याने बैठकीतून काहीही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे लिलावाविषयी अनिश्चितता निर्माण झाली. अशातच काही व्यापा-यांनी दुपारी तीन वाजता लिलाव सुरू केले. मात्र सकाळपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेकडो शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेवून आले, परंतु वेळेत लिलाव न झाल्याने त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक