शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचे होणार संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:20 IST

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त्यांची नावे नोंद करण्याची कार्यवाही तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात आहे. हाच पॅटर्न राज्यभरात लावण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

ठळक मुद्देडॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेशनाशिक पॅटर्न राज्यात राबविण्याचा देणार प्रस्ताव

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त्यांची नावे नोंद करण्याची कार्यवाही तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात आहे. हाच पॅटर्न राज्यभरात लावण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांचा आढावा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यातील चांगल्या कामांनी इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संख्या जवळपास ८०० इतकी असून त्यामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २४ इतकी आहे. यातील बहुतांश बालकांना मातेकडील नातेवाईक म्हणजेच मामा, मावशी,आजी हे सांभाळत आहेत. या बालकांचे त्यांच्या वडिलांकडील मालमत्तेत असलेला अधिकार अबाधित राहावा किंवा त्यांच्या संपत्तीची कुणी विल्हेवाट लावू नये यासाठी हक्क नोंदणीची कार्यवाही करण्याच्या सूचना तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे व्हिजिलन्स जिल्हा प्रशासनाकडून केले जात असल्याचेही मांढरे यांनी यावेळी सांगितले.

कायद्याप्रमाणे संपत्ती वारसाचा हक्क असला तरी ही बालके लहान असल्याने त्यांच्याबाबतीत फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांच्या वारस हक्काचे रक्षण व्हावे ही यामागची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन आणि महिला बालकल्याण विभाग स्वत: या प्रकरणात अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तेच्या हक्काचे रक्षण करीत आहे.

नाशिक जिल्ह्यातील हा पॅटर्न संपूर्ण राज्यात महत्त्वपूर्ण ठरणारा ठरू शकतो. यामुळे बालकांच्या हक्काचे रक्षण होणार आहे. याबाबतची शिफारस आपण राज्य शासनाला करणार असल्याची माहितीही गोऱ्हे यांनी दिली.लातूरमधील भूकंपातही असा धोका लक्षात घेऊन या काळात संपत्तीचे कोणतेही व्यवहार करू नये असा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता अशी आठवण डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी करून दिली.

टॅग्स :NashikनाशिकNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना