शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचे होणार संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:20 IST

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त्यांची नावे नोंद करण्याची कार्यवाही तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात आहे. हाच पॅटर्न राज्यभरात लावण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

ठळक मुद्देडॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेशनाशिक पॅटर्न राज्यात राबविण्याचा देणार प्रस्ताव

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त्यांची नावे नोंद करण्याची कार्यवाही तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात आहे. हाच पॅटर्न राज्यभरात लावण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांचा आढावा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यातील चांगल्या कामांनी इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संख्या जवळपास ८०० इतकी असून त्यामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २४ इतकी आहे. यातील बहुतांश बालकांना मातेकडील नातेवाईक म्हणजेच मामा, मावशी,आजी हे सांभाळत आहेत. या बालकांचे त्यांच्या वडिलांकडील मालमत्तेत असलेला अधिकार अबाधित राहावा किंवा त्यांच्या संपत्तीची कुणी विल्हेवाट लावू नये यासाठी हक्क नोंदणीची कार्यवाही करण्याच्या सूचना तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे व्हिजिलन्स जिल्हा प्रशासनाकडून केले जात असल्याचेही मांढरे यांनी यावेळी सांगितले.

कायद्याप्रमाणे संपत्ती वारसाचा हक्क असला तरी ही बालके लहान असल्याने त्यांच्याबाबतीत फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांच्या वारस हक्काचे रक्षण व्हावे ही यामागची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन आणि महिला बालकल्याण विभाग स्वत: या प्रकरणात अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तेच्या हक्काचे रक्षण करीत आहे.

नाशिक जिल्ह्यातील हा पॅटर्न संपूर्ण राज्यात महत्त्वपूर्ण ठरणारा ठरू शकतो. यामुळे बालकांच्या हक्काचे रक्षण होणार आहे. याबाबतची शिफारस आपण राज्य शासनाला करणार असल्याची माहितीही गोऱ्हे यांनी दिली.लातूरमधील भूकंपातही असा धोका लक्षात घेऊन या काळात संपत्तीचे कोणतेही व्यवहार करू नये असा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता अशी आठवण डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी करून दिली.

टॅग्स :NashikनाशिकNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना