शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संपत्तीचे होणार संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 19:20 IST

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त्यांची नावे नोंद करण्याची कार्यवाही तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात आहे. हाच पॅटर्न राज्यभरात लावण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

ठळक मुद्देडॉ. नीलम गोऱ्हे यांचे आदेशनाशिक पॅटर्न राज्यात राबविण्याचा देणार प्रस्ताव

नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त्यांची नावे नोंद करण्याची कार्यवाही तलाठी, मंडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जात आहे. हाच पॅटर्न राज्यभरात लावण्यासाठी शासनाला शिफारस करणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांचा आढावा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्ह्यातील चांगल्या कामांनी इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची संख्या जवळपास ८०० इतकी असून त्यामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या २४ इतकी आहे. यातील बहुतांश बालकांना मातेकडील नातेवाईक म्हणजेच मामा, मावशी,आजी हे सांभाळत आहेत. या बालकांचे त्यांच्या वडिलांकडील मालमत्तेत असलेला अधिकार अबाधित राहावा किंवा त्यांच्या संपत्तीची कुणी विल्हेवाट लावू नये यासाठी हक्क नोंदणीची कार्यवाही करण्याच्या सूचना तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे व्हिजिलन्स जिल्हा प्रशासनाकडून केले जात असल्याचेही मांढरे यांनी यावेळी सांगितले.

कायद्याप्रमाणे संपत्ती वारसाचा हक्क असला तरी ही बालके लहान असल्याने त्यांच्याबाबतीत फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे. त्यांच्या वारस हक्काचे रक्षण व्हावे ही यामागची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन आणि महिला बालकल्याण विभाग स्वत: या प्रकरणात अनाथ बालकांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तेच्या हक्काचे रक्षण करीत आहे.

नाशिक जिल्ह्यातील हा पॅटर्न संपूर्ण राज्यात महत्त्वपूर्ण ठरणारा ठरू शकतो. यामुळे बालकांच्या हक्काचे रक्षण होणार आहे. याबाबतची शिफारस आपण राज्य शासनाला करणार असल्याची माहितीही गोऱ्हे यांनी दिली.लातूरमधील भूकंपातही असा धोका लक्षात घेऊन या काळात संपत्तीचे कोणतेही व्यवहार करू नये असा धोरणात्मक निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता अशी आठवण डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी करून दिली.

टॅग्स :NashikनाशिकNeelam gorheनीलम गो-हेShiv Senaशिवसेना