शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ढगाळ हवामानाचा कांद्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:29 IST

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.

राजापूर : ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. कांद्याला सध्या बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने शेतकरी कांदा जगवण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. मात्र ढगाळ हवामानामुळे दिवसाआड फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.ढगाळ हवामानाचा कांदा पिकासह इतर रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे. कांदा शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाते; पण ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या बुडाला खोड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कांदा जगविण्यासाठी महागडी कीटकनाशक, बुरशीनाशक व पोषक औषधांसाठी चार ते पाच हजार रु पयांचा खर्च वाढला आहे. सद्य:स्थितीत मिळत असलेल्या दरामुळे शेतकरी खर्चही करीत आहेत. जर दर कोसले तर कर्जाच्या खाईत जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कांदा लागवडीपासून आतापर्यंत पंचवीस ते तीस हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. त्यात बदलत्या हवामानामुळे औषध व रासायनिक खताचा खर्च वाढल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा