शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

फलकबाजांना अखेर दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. यासंदर्भात महापालिकेवर टीकेची झोड उठताच प्रशासनाने एकाच दिवसात तब्बल ७५ फलक हटविले आहेत. मात्र त्यासंदर्भात अवघ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या बकालतेत भर घालणारे अजूनही शेकडो फलक ‘जैसे थे’ असून, ते बहुतांशी सत्ताधारी तसेच इच्छुकांचे असल्यानेच प्रशासन हात लावण्यास धजावत नाहीत की काय? असा प्रश्न केला जात आहे.मुख्यमंत्री नाशिकला दत्तक घेतल्यानंतर शहरात स्वच्छता टापटीप राखण्याची नैतिक जबाबदारी या पक्षाच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याला हरताळ फासण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) शहरात येणार असून, गुरुवारी (दि.१९) त्याचा समारोप होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांनी हीच संधी साधून जनादेश यात्रा आणि संपूर्ण मतदारसंघात फलक लावले आहेत. अधिकृत होर्डिंग्जशिवाय दुभाजक, रस्त्याच्या कडेला इतकेच नव्हे तर सिग्नल आणि वाहतूक बेटांनादेखील फलकांचा गराडा पडला आहे.राजकीय कार्यकर्त्यांनी हे फलक अशा जागेवर लावले आहेत की फलक लावल्यानंतर वाहतूक मार्ग न दिसता अपघात होऊ शकतात. परंतु त्याची तमा न बाळगता आजी-माजी आमदार तसेच अन्य इच्छुक आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी फलक लावले आहेत. सोमवारी (दि.१६) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेदेखील शहराच्या दौºयावर असल्याने अनेक भागात आणि मुंबई नाका येथेदेखील वाहतूक बेटावर झेंडे आणि फलक लावण्यात आले होते.या प्रकारामुळे शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात मनपाच्या पूर्व परवानीशिवाय फलक लावू नये असे स्पष्ट निर्देश असतानादेखील आदेश डावलून फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेनेदेखील उच्च न्यायालयाचे आदेश डावलल्याचा आणि सरकार पक्षावर मेहेरबानी केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर महापालिकेने काही प्रमाणात फलक हटविण्यास सुरुवात केली. शहरात विविध भागांत ७५ फलक हटविण्यात आले असून, याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नियम डावलून फलकबाजीमहापालिकेत कोणत्याही फलकांच्या उभारणीसाठी परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर त्याचा परवानगी क्रमांक फलकावर लिहावा लागतो. मात्र शहरात उभारलेल्या फलकांवर कोणत्याही प्रकारचे परवानगी क्रमांक लिहिलेले नाही त्यातच महापालिका अपघात घडेल अशा ठिकाणी म्हणजे दुभाजक, सिग्नल झाडावर किंवा वाहतूक बेटावर परवानगी देत नाही मात्र प्रत्यक्षात फलक अशाच ठिकाणी लावले असल्याने नियम डावलून फलक लावल्याचे उघड होत आहे.महापालिकेने दिवसभरात ३१ फलक हटविले. मुंबई नाका येथून काही फलक जप्त केल्यानंतर पुन्हा काही वेळातच त्याठिकाणी पुन्हा फलक लावण्यात आले. त्यामुळे फलकबाजांनी एक प्रकारे महापालिकेला आव्हान दिले आहे.आता मुख्यमंत्रीकाय करणार?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या सभेत फलकबाजांना सुनावले होते. फलक लावून उमेदवारी मिळत नाही असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले होते.मात्र त्यानंतरदेखील नाशिकमध्ये फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या फलकबाजांच्या विरोधातकाय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBanerबाणेर