शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

येवल्याच्या जरतारी पैठणीला कोरोनाची काळी किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:05 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. त्याबरोबरच पैठणी व्यवसायावर रोजीरोटी असणाºया हातमाग, विणकर कारागिरांवर रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : हातमाग, विणकरांवर बेरोजगारीची कुºहाडविशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी

योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. त्याबरोबरच पैठणी व्यवसायावर रोजीरोटी असणाºया हातमाग, विणकर कारागिरांवर रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.येवला शहरासह तालुक्यात सुमारे नऊ हजार हातमाग आहेत. या हातमागावर काम करणारे तसेच रंगणी, साननी, पदर काढणारे, उकलणारे असे सुमारे तीस हजार विणकर, कारागीर आहेत. लग्नाच्या सीझनमध्ये सुमारे शंभर-सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनाने बाजारपेठा, लग्न सोहळे-समारंभ ठप्प झाल्याने विक्रे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याबरोबरच विणकर-कारागिरांचेही वर्षाचे आर्थिक गणित बिघडले आहे. पैठणी उद्योगाबरोबरच विणकर, कारागिरांसाठी शासानाने तातडीने विशेष उपाययोजनेत आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.येवल्याची पैठणी जगभर प्रसिद्ध आहे. शहर परिसरातील सुमारे चाळीस टक्के कुटुंबं पैठणीनिर्मिती व्यवसायात आहे. सद्य:स्थितीत शहर व तालुका परिसरात सुमारे चारशेपेक्षा अधिक पैठणी विक्रीची दुकाने आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने येवल्यातील पैठणी व्यवसायही लॉक झाला. राज्यबंदी, जिल्हाबंदी, गावबंदी-सीमाबंदीने ग्राहक नाही. ऐन लग्नसराईत लॉकडाउनने विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही विणकर-कारागिरांनी तर कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला होता. कोरोनाने त्यांच्यावरील कर्जाचा भार अधिकच वाढवला असून, आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तर कारागीर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या