शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

येवल्याच्या जरतारी पैठणीला कोरोनाची काळी किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:05 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. त्याबरोबरच पैठणी व्यवसायावर रोजीरोटी असणाºया हातमाग, विणकर कारागिरांवर रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाउनचा फटका : हातमाग, विणकरांवर बेरोजगारीची कुºहाडविशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी

योगेंद्र वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच क्षेत्र बाधित झाले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाउन व संचारबंदी लागू केली. यात सर्वच छोटे-मोठे उद्योग लॉक झालेत. जगभर जाणाऱ्या येवल्याच्या पैठणीलाही या टाळेबंदीचा मोठा फटका बसला आहे. ऐन लग्नसराई हंगामात कोट्यवधींचा व्यवसाय बुडाला. त्याबरोबरच पैठणी व्यवसायावर रोजीरोटी असणाºया हातमाग, विणकर कारागिरांवर रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.येवला शहरासह तालुक्यात सुमारे नऊ हजार हातमाग आहेत. या हातमागावर काम करणारे तसेच रंगणी, साननी, पदर काढणारे, उकलणारे असे सुमारे तीस हजार विणकर, कारागीर आहेत. लग्नाच्या सीझनमध्ये सुमारे शंभर-सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनाने बाजारपेठा, लग्न सोहळे-समारंभ ठप्प झाल्याने विक्रे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याबरोबरच विणकर-कारागिरांचेही वर्षाचे आर्थिक गणित बिघडले आहे. पैठणी उद्योगाबरोबरच विणकर, कारागिरांसाठी शासानाने तातडीने विशेष उपाययोजनेत आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.येवल्याची पैठणी जगभर प्रसिद्ध आहे. शहर परिसरातील सुमारे चाळीस टक्के कुटुंबं पैठणीनिर्मिती व्यवसायात आहे. सद्य:स्थितीत शहर व तालुका परिसरात सुमारे चारशेपेक्षा अधिक पैठणी विक्रीची दुकाने आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने येवल्यातील पैठणी व्यवसायही लॉक झाला. राज्यबंदी, जिल्हाबंदी, गावबंदी-सीमाबंदीने ग्राहक नाही. ऐन लग्नसराईत लॉकडाउनने विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही विणकर-कारागिरांनी तर कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला होता. कोरोनाने त्यांच्यावरील कर्जाचा भार अधिकच वाढवला असून, आता कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तर कारागीर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या