शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आता निष्ठावानांना गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:15 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच अशाप्रकारचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाली असली होऊ घातलेल्या निवडणुकांची आचारसंहिता बघता ही पदे कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपदे देण्यासाठी विचारणा : मात्र औटघटकेची ठरणार पदे

नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने दुरावलेल्या आणि पक्षापासून दूर केलेल्या कार्यकर्त्यांना चुचकारणे सुरू केले असून, त्यांना विविध स्थानिक स्तरावरील समित्यांवर काम करण्यासाठी विचारणा करणे सुरू झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरूनच अशाप्रकारचे आदेश देण्यात आले असून, त्यामुळे ही कार्यवाही सुरू झाली असली होऊ घातलेल्या निवडणुकांची आचारसंहिता बघता ही पदे कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.राज्यातील सत्ताधारी भाजपा केवळ गाजर दाखवतात, अशाप्रकारची टीका विरोधक करीत असताना आता भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांनादेखील पदांचे गाजर दाखविण्यास सुरुवात केल्याची टीका अंतस्थ भाजपातच सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पाच वर्षांपूर्वी विजय झाल्यानंतर अनुकूल वातावरण लक्षात घेतल्यानंतर पक्षात आयारामांची रीघ लागली. परपक्षातून येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यामुळे पक्षातील नेत्यांनी मूळ निष्ठावांना बाजूला सारण्यास सुरुवात केली. पक्ष मोठा करायचा असेल तर बाहेरून येणाऱ्यांना संधी दिली पाहिजे, असे धडे दिल्यानंतर जुन्या कार्यकर्त्यांना जात, पैसा आणि अन्य कारणांवरून मागे हटविण्यास सुरुवात झाली. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या निवडणुकीतदेखील डावलण्यात आले. त्यामुळे पक्षाशी निष्ठावान परंतु सध्याचे राजकीय वातावरण न मानवलेल्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये दूर राहणेच पसंत केले. संघ प्रतिष्ठान नामक संस्थादेखील अशा निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थापन केली असून, त्या माध्यमातून ते पक्षाला पूरक कामे करीत असतात. तथापि, पाच राज्यांत भाजपाला फटका बसल्यानंतर आता पक्षाला पुन्हा जुने कार्यकर्ते आठवले असून, त्यांना पदे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर आमदारांकडून आणि नेत्यांकडून जुन्या आणि दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांना विविध शासकीय समित्यांपैकी कशावर काम करायला आवडेल, अशा प्रकारची विचारणा केली जात आहे. कोणत्याही समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली तरी एक ते दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार असून, ही निवडणूक संपल्यानंतर काही दिवसांतच विधासभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल. त्यामुळे समित्यांच्या बैठकाही होणार नाही. त्यामुळे पदे मिळवून लेटरपॅड आणि व्हिजिंटिंग कार्डशिवाय त्याला महत्त्व उरणार नाही, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे.इतक्या वर्षांतपदे का दिली नाही?राज्यात सत्ता येऊन आता पाच वर्षे होत आहेत, जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाच होता तर या कालावधीत आठवण का झाली नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून केला जात आहे..

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा