शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

जिल्हा बॅँकेला भाजपचाच घरचा ‘अहेर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:29 AM

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेने सुरू केलेल्या शेतकऱ्यांकडील सक्तीच्या कर्जवसुलीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण तापले असतानाच, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेने शेतकºयांची कर्जवसुली थांबवावी, असे साकडे घातले असून, बॅँकेकडून राज्य सरकारच्या आदेशाचा भंग केला जात असल्याचा ठपका ठेवत, शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे परस्पर नावे लावण्याची कृतीदेखील कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगून बॅँकेवर सक्त कारवाई करण्याची मागणीच फरांदे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसक्तीची वसुली थांबवा : फरांदे यांचे प्रशासनाला साकडे

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेने सुरू केलेल्या शेतकऱ्यांकडील सक्तीच्या कर्जवसुलीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण तापले असतानाच, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेने शेतकºयांची कर्जवसुली थांबवावी, असे साकडे घातले असून, बॅँकेकडून राज्य सरकारच्या आदेशाचा भंग केला जात असल्याचा ठपका ठेवत, शेतकºयांच्या सातबारा उताºयावर बॅँकेचे परस्पर नावे लावण्याची कृतीदेखील कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगून बॅँकेवर सक्त कारवाई करण्याची मागणीच फरांदे यांनी केली आहे.सोमवारी दुपारी आमदार फरांदे यांनी शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट असून, टंचाईची स्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून शेतकºयांचे कर्ज वसुलीसाठी प्रयत्नांना वेग आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला असून, जिल्हा बॅँकेकडून वसुली करताना शासन नियमांचे उल्लंघन करून वसुली करण्यात येत आहे.या विविध कार्यकारी सोसायटीकडून शेतकरी कर्ज घेत असतात व सदर सोसायटी जिल्हा बॅँकेकडून कर्ज घेत असते. त्यासाठी सोसायट्यांना नफा दिला जात असतो. जिल्हा बॅँक व महसूल विभागाच्या काही अधिकाºयांनी शेतकºयांच्या सातबारा उताºयावरील विविध सोसायट्यांचे नाव कमी करून जिल्हा बॅँकेचे नाव लावलेले आहे. यासाठी संबंधित शेतकºयांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. अशाप्रकारे सातबारा उताºयावर परस्पर बदल करणे हा दखलपात्र गुन्हा असून, याबाबत बॅँकेवर सक्त कारवाई करणे गरजेचे असल्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. आमदार फरांदे यांनी या पत्रासोबत शासनाचा निर्णयच पुराव्यासोबत जोडला असून, शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठण करणे व शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती असल्याचे नमूद असतानाही दुष्काळी मंडलातील गावांच्या शेतकºयांकडून कर्जवसुली केली जात आहे. थकीत कर्ज असणाºया शेतकºयांना रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणात एकरकमी कर्जवसुली सुरू असून, त्यात शेतकºयांना मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. परंतु जिल्हा बॅँकेकडून रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाप्रमाणे एकरकमी कर्जवसुली योजना न राबविता कर्जवसुली केली जात आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेकडून बेकायदेशीरपणे सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवावी, अशी विनंतीही फरांदे यांनी जिल्हाधिकाºयांना केली आहे.