शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:21 IST

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देसध्या चार आमदार । १९९० चीच स्थिती; आता खरी परीक्षा

नाशिक : भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.१९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर सतत विरोधी पक्षात राहिलेल्या पक्षाने आज मोठी मजल मारली असून, देशात तसेच राज्यात सत्तेत आहे; परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत सुवर्णकाळ असताना एकूण पंधरा मतदारसंघांमध्ये चारपेक्षा अधिक भाजपचे आमदार नाहीत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९८० मध्ये येवल्यातून पक्षाचे भानुदास कदम यांनी येवला मतदारसंघातून तर (कै.) गणपतराव काठे यांनी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र त्यात दोघांचा पराभव झाला होता. पक्षाला चांगले घवघवीत यश मिळाले ते १९८५ मध्ये. यावेळी भाजपचे प्रथमच तीन उमेदवार विजयी झाले. पक्ष स्थापनेनंतर भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे पहिले मोठे यश होते; परंतु त्यापेक्षा एक जागा अधिक मिळवून पक्षाने १९९० मध्ये बाजी मारली. अर्थात, हे सर्व करतानाच शिवसेना आणि भाजपची युती होतीच. १९९५ मध्ये युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी खरे तर भाजपला अधिक जागा मिळणे अपेक्षित होते; परंंतु अवघ्या तीन जागा मिळाल्या. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. दौलतराव आहेर यांचा विजय झाला. तर २००४ मध्ये त्यांचा पराभव कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढले आणि मनसेचे तीन आमदार निवडून आले. देवळालीची जागा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने राखली. आता युतीबाबत चर्चा सुरू असली तरी भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.२०१४ मध्ये झालेल्या मोदी लाटेत भाजपचे नशीब फळफळले आणि सेनेशी युती नसताना शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचप्रमाणे चांदवड, देवळा या मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना संधी मिळाली. अर्थात, भाजपचे सुसाट वारे असतानाही भाजपला चार आमदारांच्या पलीकडे उमेदवार निवडून आणता आले नाही. १९९० मध्ये हीच स्थिती होती. त्यापलीकडे भाजप प्रभावी ठरू शकलेला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकBJPभाजपा