शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:21 IST

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देसध्या चार आमदार । १९९० चीच स्थिती; आता खरी परीक्षा

नाशिक : भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.१९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर सतत विरोधी पक्षात राहिलेल्या पक्षाने आज मोठी मजल मारली असून, देशात तसेच राज्यात सत्तेत आहे; परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत सुवर्णकाळ असताना एकूण पंधरा मतदारसंघांमध्ये चारपेक्षा अधिक भाजपचे आमदार नाहीत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९८० मध्ये येवल्यातून पक्षाचे भानुदास कदम यांनी येवला मतदारसंघातून तर (कै.) गणपतराव काठे यांनी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र त्यात दोघांचा पराभव झाला होता. पक्षाला चांगले घवघवीत यश मिळाले ते १९८५ मध्ये. यावेळी भाजपचे प्रथमच तीन उमेदवार विजयी झाले. पक्ष स्थापनेनंतर भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे पहिले मोठे यश होते; परंतु त्यापेक्षा एक जागा अधिक मिळवून पक्षाने १९९० मध्ये बाजी मारली. अर्थात, हे सर्व करतानाच शिवसेना आणि भाजपची युती होतीच. १९९५ मध्ये युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी खरे तर भाजपला अधिक जागा मिळणे अपेक्षित होते; परंंतु अवघ्या तीन जागा मिळाल्या. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. दौलतराव आहेर यांचा विजय झाला. तर २००४ मध्ये त्यांचा पराभव कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढले आणि मनसेचे तीन आमदार निवडून आले. देवळालीची जागा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने राखली. आता युतीबाबत चर्चा सुरू असली तरी भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.२०१४ मध्ये झालेल्या मोदी लाटेत भाजपचे नशीब फळफळले आणि सेनेशी युती नसताना शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचप्रमाणे चांदवड, देवळा या मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना संधी मिळाली. अर्थात, भाजपचे सुसाट वारे असतानाही भाजपला चार आमदारांच्या पलीकडे उमेदवार निवडून आणता आले नाही. १९९० मध्ये हीच स्थिती होती. त्यापलीकडे भाजप प्रभावी ठरू शकलेला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकBJPभाजपा