शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाजपचे आजवरचे बळ मर्यादितच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:21 IST

भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देसध्या चार आमदार । १९९० चीच स्थिती; आता खरी परीक्षा

नाशिक : भाजप स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक काळ युती आणि एक निवडणूक स्वतंत्र्यरीत्या लढत दिल्यानंतर भाजपचे बळ वाढले असले तरी चार आमदार हा भाजपचा सर्वाधिक मोठा आकडा राहिला आहे. सध्या भाजपचा सुवर्णकाळ असतानादेखील पक्षाचे चारच उमेदवार रिंगणात आहेत.१९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर सतत विरोधी पक्षात राहिलेल्या पक्षाने आज मोठी मजल मारली असून, देशात तसेच राज्यात सत्तेत आहे; परंतु नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत सुवर्णकाळ असताना एकूण पंधरा मतदारसंघांमध्ये चारपेक्षा अधिक भाजपचे आमदार नाहीत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९८० मध्ये येवल्यातून पक्षाचे भानुदास कदम यांनी येवला मतदारसंघातून तर (कै.) गणपतराव काठे यांनी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र त्यात दोघांचा पराभव झाला होता. पक्षाला चांगले घवघवीत यश मिळाले ते १९८५ मध्ये. यावेळी भाजपचे प्रथमच तीन उमेदवार विजयी झाले. पक्ष स्थापनेनंतर भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे पहिले मोठे यश होते; परंतु त्यापेक्षा एक जागा अधिक मिळवून पक्षाने १९९० मध्ये बाजी मारली. अर्थात, हे सर्व करतानाच शिवसेना आणि भाजपची युती होतीच. १९९५ मध्ये युतीची सत्ता राज्यात आली. त्यावेळी खरे तर भाजपला अधिक जागा मिळणे अपेक्षित होते; परंंतु अवघ्या तीन जागा मिळाल्या. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. दौलतराव आहेर यांचा विजय झाला. तर २००४ मध्ये त्यांचा पराभव कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला. २००९ मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढले आणि मनसेचे तीन आमदार निवडून आले. देवळालीची जागा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने राखली. आता युतीबाबत चर्चा सुरू असली तरी भाजपच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.२०१४ मध्ये झालेल्या मोदी लाटेत भाजपचे नशीब फळफळले आणि सेनेशी युती नसताना शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळाले. त्याचप्रमाणे चांदवड, देवळा या मतदारसंघात डॉ. राहुल आहेर यांना संधी मिळाली. अर्थात, भाजपचे सुसाट वारे असतानाही भाजपला चार आमदारांच्या पलीकडे उमेदवार निवडून आणता आले नाही. १९९० मध्ये हीच स्थिती होती. त्यापलीकडे भाजप प्रभावी ठरू शकलेला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकBJPभाजपा