शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भाजपामुळे वाढणार चुरस

By admin | Updated: February 1, 2017 22:27 IST

महिलांसाठी राखीव : गणाकडे तालुक्याचे लक्ष !

अशोक देशमुख ओतूरकळवण तालुक्यातील अभोणा गटातील नरूळ गण यंदा सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने मातब्बर पुढाऱ्यांचा हिरमोड झाला असून, अनेक नेते सौभाग्यवतींना उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा प्रथमच या गणात भाजपा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने जोरदार चुरस वाढणार आहे.सन १९९२ ते १९९७ या काळात या गणातील अपक्ष उमेदवार मावंजी गायकवाड यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविले आहे. १९९७ साली मोहनदरी गण होता. त्यानंतर १९९२, २००२, २००७, २०१२ या पंचवार्षिकमध्ये नरूळ गण अस्तित्वात आला. प्रत्येक वेळी अभोणा गटाचे यशवंत गवळी हे या गणाचे केंद्रबिंदू ठरले. या पाच पंचवार्षिकमध्ये चार वेळा काँग्रेसचे उमेदवार, तर एकवेळा अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. नरूळ गणातून मावजी गायकवाड, बेबीताई चव्हाण (१९९७), संपत भोये (२००२), बळीराम देवरे (२००७), बेबीबाई गावित (२०१२) यांनी प्रतिनिधित्व केले आहे.कळवण तालुक्यातील चारही गटात अनेक राजकीय मतप्रवाह बदललेत तरी अभोणा गटाचे प्रतिनिधित्व आजपर्यंत काँग्रेसनेच केले आहे. त्यातील नरूळ गणातील पाचपैकी चार वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. फक्त एक वेळा १९९२ मध्ये जनरल पुरुष जागेवर अनु.जमातीचे अपक्ष उमेदवार मावजी गायकवाड विजयी झाले होते व ते कळवण उपसभापतीही झाले होते. तसेच २००२ मध्ये या गणातून निवडून आलेले संपत भोये यांनाही उपसभापतिपदाचा मान मिळाला होता. गेल्या २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बेबीताई गावित निवडून आल्या असून, त्या विद्यमान सदस्य आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने फारशी परिणामकारक कामगिरी त्यांना करता आली नाही. या गणात भाजपाचेही पदाधिकारी काही वर्षांपासून सक्रिय झाले असून, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी ओतूर धरणाच्या कामाला चालना दिल्यामुळे भाजपाचा मतप्रवाह वाढला आहे. तर राष्ट्रवादीचा मतप्रवाह कमी झाला आहे. तसेच आमदार जे.पी. गावित यांनी प्रत्यक्षपणे ओतूर धरणाचा पाणी गळतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून काम सुरू केल्याने माकपाचे प्राबल्य वाढले आहे.