शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देशातील आर्थिक मंदीला भाजपाच जबाबदार : संजय राऊत

By श्याम बागुल | Updated: September 4, 2019 15:33 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अ‍ॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फार्म्युला यापुर्वीच ठरलेला शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशात आर्थिक कोंडीत सापडला असून, मंदीमुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात कोणताही कमीपणा नको. तीन वर्षापुर्वीच्या नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी लागू करण्याला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे आता आलेल्या आर्थिक मंदीला भाजपाच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा शिवसेनेला अधिकार नाही असा निर्वाळाही त्यांनी दिला.

खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक भेटीवर आले असून, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षापुर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकित केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, अ‍ॅटोमोबाईल, टेक्सटाईल, फार्मास्युटीकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले असून, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती सावरण्यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास सरकारने घेतलेले ३७० कलम रद्द करण्याचा तसेच राम मंदिरासारख्या प्रश्नांवरील निर्णयांना काही अर्थ राहणार नाही. या प्रश्नांपेक्षा लोकांना पोटाचा प्रश्न महत्वाचा वाटतो अशी पृष्टीही त्यांनी जोडली. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी, आमचा एकच मंत्री आहे. देशाचे धोरणे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री ठरवित असतो. त्यामुळे देशापुढे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीशी शिवसेनेचा संबंध नाही, त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेचा फार्म्युला ठरला असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी वरळीतील हॉटेलमध्ये भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमीत शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीचा फार्म्युला एकदा ठरला आहे. जागा वाटप व सत्तेत वाटा ‘फिफ्टी-फिफ्टी’ ठरलेले असून येत्या निवडणूकीत महाराष्टÑात युतीला ऐतिहासिक यश मिळेल याची खात्री वाटल्यानेच कॉँग्रेस-राष्टÑवादीचे तंजावर नेते पक्षांतर करीत असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. या पक्षांतरात आमच्याकडे ‘वॉशिंग’ मशीन नसल्याने आम्ही प्रत्येकाला परखून घेत आहोत, त्याच बरोबर ज्या मतदार संघात पक्षाची कमकुवत परिस्थिती आहे, अशा पर्याय नसलेल्या मतदार संघातच अन्य पक्षातील व्यक्तींना आम्ही प्रवेश देत असल्याचे सांगून राऊत यांनी, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या २८ आमदारांनी सेनेत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली होती परंतु स्थानिक सैनिकांचा विरोध असल्यामुळे सेनेने त्यांना प्रवेश नाकारला. हे सर्व जण भाजपात गेले व निवडून आले. त्यामुळे भाजपाला सेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यावेळी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, डी. जी. सुर्यवंशी, सुहास कांदे आदी उपस्थित होते.चौकट====

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक