शहरं
Join us  
Trending Stories
1
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
2
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
3
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
4
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
5
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
6
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
7
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
8
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
9
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
10
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
11
माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
12
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
13
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
14
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
15
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
16
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
17
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
18
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
19
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
20
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

भाजपत रांग म्हणजे निष्ठावंतांनी पुन्हा वळकटी बांधावी!

By किरण अग्रवाल | Updated: January 17, 2021 01:08 IST

गिते, बागुल पक्ष सोडून गेले म्हणून काय झाले, भाजपत यायला रांगेत अनेकजण उभे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा घाम फुटणे स्वाभाविक ठरले आहे.

ठळक मुद्देफडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात नव्याने भरतीचे सूतोवाचमहापालिकेसाठी शिवसेनेशीच लढतीचे संकेत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले निर्नायकत्व उघड करून दिले आहे.

सारांशरांगा कुठे नसतात, आपल्याकडे तर घासलेटच्या दुकानांसमोरही त्या असतात; त्यामुळे संधीच्या शोधात असणाऱ्यांची रांग भाजपच्या दारापुढे असेल तर त्यात विशेष काय? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षात येणारेही अनेकजण रांगेत असतीलच, त्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. प्रश्न इतकाच आहे, रांगेत उभ्या असणाऱ्यांची उपयोगिता लक्षात घेऊन त्यांना पक्षात घेणार, की पक्ष विस्तारायचा म्हणून गेल्यावेळेप्रमाणे येईल त्या सर्वांचीच भरती करून पक्षातील निष्ठावंतांना पुन्हा ताटकळवणार?भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडील नाशिक दौऱ्यातून सदरचा प्रश्न निर्माण झाल्याने पक्षांतर्गत चुळबुळ सुरू होऊन जाणे स्वाभाविक ठरले आहे; परपक्षातून आल्या-आल्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बसवले गेलेले वसंत गिते व सुनील बागुल पक्ष सोडून गेल्याच्या संदर्भातून बोलताना फडणवीस यांनी आपल्याकडेही अनेकजण रांगेत असल्याचे सांगितले. याच दौऱ्यात अन्य पक्षांतील एक माजी आमदार फडणवीस यांना भेटल्याचे ह्यट्रेलरह्णही नाशिककरांना पाहावयास मिळाला, त्यामुळे दोनजण गेले असले तरी त्यापेक्षा अधिकजण आपल्याकडे येण्याच्या तयारीत आहेत असे त्यांनी सांगणे हा राजकीय शह-काटशहाचा भाग झाला, परंतु खरेच तसे होणार असेल तर पक्षातील निष्ठावंतांनी आतापासूनच आपल्या वळकट्या बांधून ठेवायला हरकत नसावी.नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी ह्यमनसेह्णमधून मोठा लोंढा भाजपत आला होता, त्यामुळे पक्षातील अनेकांच्या संधी हिरावल्या गेल्या. आता आणखी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिते व बागुल पक्ष सोडून गेल्याने त्यांना जरा कुठे हायसे वाटत असताना व संधीची दारे किलकिली होऊ पाहताना खुद्द फडणवीस यांनीच दारासमोरील रांगेत अनेकजण असल्याचे जाहीरपणे संकेत देऊन टाकल्याने पक्षनिष्ठांच्या भुवया वक्री होणे क्रमप्राप्त ठरावे. अर्थात एक बरे झाले, पक्ष सोडून जाणारा इकडे असताना चांगला असतो आणि दुसरीकडे जातो म्हणून वाईट बनतो असे नाही याची स्पष्टता फडणवीस यांनी करून देऊन राजकीय प्रासंगिक कौशल्य व परिपक्वता काय असते याचाही प्रत्यय आणून दिला. तीच त्यांची जमेची बाब; पण या बऱ्यावाईटातील निरक्षिरता भरती प्रक्रियेनिमित्तही तपासली जात नाही हे खरे.महत्त्वाचे म्हणजे फडणवीस यांच्याकडे आता मुख्यमंत्रिपद नाही ही वास्तविकता नाशिक महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अद्यापही स्वीकारलेली दिसत नाही म्हणून की काय, कर्ज काढण्याच्या मागणीसाठी त्यांनी फडणवीस यांना भेटून गळ घातली व महापालिका आयुक्तांना तशा सूचना देण्याचे सांगितले. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी हे इलेक्शन वर्ष आहे, त्यामुळे फक्त भूमिपूजने करून चालणार नाही तर कामे करून दाखवावी लागणार आहेत. त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांतून निधी मिळविण्यासाठी फडणवीस यांची मध्यस्थी अपेक्षित धरणे ठीक आहे; परंतु कर्ज काढण्यासाठीही त्यांचा ह्यशब्दह्ण खर्ची घालण्याचा प्रयत्न झाला. हा सर्वस्वी स्थानिक स्थितीवर अवलंबून असणारा व स्थानिक स्वराज्य संस्थेतील निर्णय असताना त्यासाठी फडणवीसांना साकडे घालून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा आपले निर्नायकत्व उघड करून दिले आहे.महापालिकेसाठी शिवसेनेशीच लढतीचे संकेतनाशकातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी म्हणून टायर बेस्ड मेट्रोचा प्रकल्प साकारण्याचे राज्यातील गेल्या सरकारने ठरविले होते. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी घाईगर्दीत त्याचे भूमिपूजन उरकून घेण्याचेही घाटत होते, पण ते राहिले. आता हा प्रकल्प शिवसेनेमुळे रखडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. वस्तुतः महापालिकेत, राज्यात व केंद्रातही भाजपचेच सरकार असताना ते घडून येऊ शकले नाही. सध्या जिल्ह्याचे पालकत्व छगन भुजबळ यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडे आहे, तेव्हा या रखडलेल्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे जावी; पण फडणवीस यांनी त्याच्या विलंबाला शिवसेनेला जबाबदार धरले यावरून महापालिकेसाठी स्पर्धा कुणात आहे याचेच संकेत मिळावेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाVasant Giteवसंत गीते