शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला

By संजय पाठक | Updated: October 18, 2019 02:02 IST

ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.

ठळक मुद्देआधी होती शिवसेनेची मागणी : हिंदुत्ववाद्यांना चुचकारण्याचे प्रयत्न

नाशिक : ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे; मात्र त्यांना सतत वादात ढकलण्याचे प्रयत्न राजकारण्यांनी केल्याची भावना सावरकरप्रेमींमध्ये आहे. अंदमानच्या जेलमधून सुटकेसाठीचा माफीनामा आणि अन्य कारणांवरून सावरकरांना वादात ठेवून त्यांच्या अन्य कार्याकडे आणि प्रतिभेकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचीदेखील भावना व्यक्त केली जाते.सावरकर हे क्रांतिकारकच नव्हे तर ते भाषातज्ज्ञ, कवी होते. शिवाय जातिअंत चळवळीचे त्यांचे कार्यदेखील महत्त्वाचे होते, असे समर्थक मानतात; परंतु त्यानंतरदेखील त्यांचा यथोचित राष्टÑपुरुष म्हणून गौरव होत नसल्याची खंतदेखील व्यक्त केली जाते. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी हिंदुत्ववादी म्हणून त्यांना कायम मानाचे स्थान दिले असले तरी त्यांच्याकडूनदेखील सावरकरांची प्रतिमा उजागर करण्यासाठी फार प्रयत्न केले जात नसल्याची खंत बोलून दाखविली जात होती. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा उचलला आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जवळपास सर्वच सभांमध्ये त्याचा उल्लेख करताना सावरकर यांना भारतरत्न मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही जाहीर केले; परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र भाजपानेच हा मुद्दा पळवून आपल्या जाहीरनाम्यात घातला आहे.क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी सुखावले असले तरी वारंवार होणारी मागणी पूर्ण होणार काय याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकमधूनही प्रयत्नस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी नाशिकच्या शिवसैनिक असलेल्या अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन पंतप्रधानांना निवेदन पाठविण्याचा संकल्प केला असला तरी दुर्दैवाने त्यांच्या अपघाती निधनानंतर संकल्प अर्धवट राहिला.४सावरकरांच्या भगूर येथील वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयाचेदेखील संवर्धन केले जात आहे. शिवाजी उद्यानाचे उद्घाटनही सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा