शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भारतरत्नचा मुद्दा भाजपने पळविला

By संजय पाठक | Updated: October 18, 2019 02:02 IST

ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.

ठळक मुद्देआधी होती शिवसेनेची मागणी : हिंदुत्ववाद्यांना चुचकारण्याचे प्रयत्न

नाशिक : ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हाती घेतला होता; मात्र विधानसभेच्या जाहीरनाम्यात तो भाजपने पळविला आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे; मात्र त्यांना सतत वादात ढकलण्याचे प्रयत्न राजकारण्यांनी केल्याची भावना सावरकरप्रेमींमध्ये आहे. अंदमानच्या जेलमधून सुटकेसाठीचा माफीनामा आणि अन्य कारणांवरून सावरकरांना वादात ठेवून त्यांच्या अन्य कार्याकडे आणि प्रतिभेकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचीदेखील भावना व्यक्त केली जाते.सावरकर हे क्रांतिकारकच नव्हे तर ते भाषातज्ज्ञ, कवी होते. शिवाय जातिअंत चळवळीचे त्यांचे कार्यदेखील महत्त्वाचे होते, असे समर्थक मानतात; परंतु त्यानंतरदेखील त्यांचा यथोचित राष्टÑपुरुष म्हणून गौरव होत नसल्याची खंतदेखील व्यक्त केली जाते. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांनी हिंदुत्ववादी म्हणून त्यांना कायम मानाचे स्थान दिले असले तरी त्यांच्याकडूनदेखील सावरकरांची प्रतिमा उजागर करण्यासाठी फार प्रयत्न केले जात नसल्याची खंत बोलून दाखविली जात होती. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा उचलला आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जवळपास सर्वच सभांमध्ये त्याचा उल्लेख करताना सावरकर यांना भारतरत्न मिळविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही जाहीर केले; परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र भाजपानेच हा मुद्दा पळवून आपल्या जाहीरनाम्यात घातला आहे.क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांनाही भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी सुखावले असले तरी वारंवार होणारी मागणी पूर्ण होणार काय याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे.नाशिकमधूनही प्रयत्नस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी नाशिकच्या शिवसैनिक असलेल्या अ‍ॅड. नीलेश कुलकर्णी यांनी एक लाख नागरिकांच्या सह्या घेऊन पंतप्रधानांना निवेदन पाठविण्याचा संकल्प केला असला तरी दुर्दैवाने त्यांच्या अपघाती निधनानंतर संकल्प अर्धवट राहिला.४सावरकरांच्या भगूर येथील वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. अभिनव भारत संस्थेच्या कार्यालयाचेदेखील संवर्धन केले जात आहे. शिवाजी उद्यानाचे उद्घाटनही सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा