शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

भाजपा विरोधक एकवटले

By admin | Updated: April 9, 2017 00:04 IST

महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम आहे

 नाशिक : राजकारणात कुणी कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो. सत्तापदांचा लाभ मिळविण्यासाठी पक्षीय विचारसरणी अथवा ध्येयधोरणांना तिलांजली दिली जाते आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घातले जातात. महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही विरोधकांना स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर प्रतिनिधित्व मिळण्याची आस कायम असून, त्याचेच निमित्त होत सर्व भाजपा विरोधक एकवटले आहेत. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपा विरोधात असलेल्या सेनेच्या उमेदवाराला कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या सदस्यांनी मतदान करत संघर्षाचे बिगुल फुंकले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाने ६६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले तर त्याखालोखाल शिवसेना-३५, कॉँग्रेस-६, राष्ट्रवादी-६, मनसे-५, अपक्ष-३ आणि रिपाइं-१ असे बलाबल आहे. महापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने सर्व सत्तापदे साहजिकच भाजपाच्याच ताब्यात जाणार, हे निश्चित आहे. मात्र, भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेसह सर्व विरोधक एकत्र आले आहेत. महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने विरोधकांची भूमिका स्पष्ट झालेली नव्हती. परंतु, स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवर तौलनिक संख्याबळात आपण भाजपाच्या ऊरात धडकी भरवू शकतो, हे लक्षात आल्याने सेनेसह सर्व विरोधकांनी एकत्र येत विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीचा डाव रचला. या डावात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने अपक्षांना सोबत घेत बाजी मारली परंतु शिवसेना-रिपाइंच्या गटनोंदणीला विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने खोडा घातला. त्यामुळे तौलनिक संख्याबळात भाजपाच सरस राहिली. शिवसेनेने विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असले तरी त्या निर्णयाची प्रतीक्षा करेपर्यंत भाजपा मात्र सत्तापदांचा पुरेपूर लाभ उठवणार आहे. विभागीय आयुक्तांनी सेना-रिपाइं एकत्रित गटनोंदणी केली असती तर स्थायीवर ८-८ असे समसमान बलाबल होऊन सभापतिपदासाठी चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करावा लागला असता. परंतु, सद्यस्थितीत भाजपाचे ९ आणि विरोधकांचे ७ असे बलाबल असल्याने स्थायीवर भाजपाचाच वरचष्मा असणार आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने सेना उमेदवाराला उघडपणे मतदान करत कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यापुढे सभागृहात ६६ विरुद्ध ५६ असा सामना बघायला मिळणार आहे. मागील पंचवार्षिक काळातील उत्तरार्धातही भाजपा विरोधात अन्य सर्व पक्ष एकवटले होते. आताही त्याचीच पुनरावृत्ती बघायला मिळणार असून, ही भाजपाविरोधी आगामी संघर्षाची नांदी मानली जात आहे. (प्रतिनिधी)