शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महापौर निवडणुकीच्या आधीच भाजपात खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:25 IST

भाजपात आधीच असलेली गटबाजी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पक्षाने दणका दिल्यानंतर झालेली फाटाफूट आणि आता राज्यात सत्तेविषयी शंका असतानाच पक्षातील अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली आहे. विशेषत: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी तीन वर्षातील कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्ट केल्याने ऐन महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनाराजी : जाहीर टीकेमुळे रंगले राजकारण

नाशिक : भाजपात आधीच असलेली गटबाजी, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पक्षाने दणका दिल्यानंतर झालेली फाटाफूट आणि आता राज्यात सत्तेविषयी शंका असतानाच पक्षातील अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली आहे. विशेषत: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी तीन वर्षातील कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्ट केल्याने ऐन महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.भाजपचे महापालिकेत बहुमत आहे. तथापि, सत्तेची फळे मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी चाखल्याचा नगरसेवकांचा आरोप आहे. नगरसेवक निधी मंजूर होऊन सुद्धा त्याची कामे रखडली आहेत. छोटी छोटी कामे होत नसल्याने नव्या नगरसेवकांची तीव्र नाराजी आहे. महापालिकेत महापौर म्हणून रंजना भानसी यांच्याकडे नेतृत्व आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. माजी आमदार बाळासाहेब सानप आणि त्यांच्या हाती महापालिकेची सूत्रे होती. परंतु नगरसेवकांकडे लक्ष पुरवले गेले नाही. त्यामुळे महापालिकेतील सत्तेला तीन वर्षे पूर्ण होत असतानाही कामे होत नसल्याची खंत कार्यकर्ते व्यक्त करीत असतात. शुक्रवारी (दि.८) भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत या मर्मावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील बागुल यांनी बोट ठेवले आणि तीन वर्षांत नगरसेवकांना निधी मिळाला नाही आणि समाधानकारक काम झालेले नाही, असे त्यांनी जाहीरपणे महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीतच सुनावले.पुढील महिन्यात महापौरपदाची निवडणूक होऊ घातली आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असतानादेखील शिवसेना महापौरपदावर डोळा ठेवून समीकरणे जुळवण्याची तयारी करीत आहेत. भाजपने नाकारलेल्या माजी आमदार सानप यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. त्यातच महापालिकेचा गेल्या पंचवीस-तीस वर्षातील लोकनियुक्त कारकिर्दीचा इतिहास तपासला तर शेवटच्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात फाटाफूट होते. अशा स्थितीत प्रदेश उपाध्यक्ष बागुल यांच्या विधानामुळे पक्षांतर्गत नाराजीला फुंकर घातली गेली आहे.भाजपातील नाराजी ही नवीन नाही. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवली ही एक नाराजी पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाचे गटनेते जगदीश पाटील यांनी महासभेच्या ठरावात घुसखोरीवरून माजी आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा