शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

फोडाफोडीच्या धास्तीने भाजप नगरसेवक आज सहलीवर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:26 IST

राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात आणि भाजपच्या नगरसेवकांत फोडाफोडीचे राजकारण होऊ शकत असल्याने त्यामुळे पक्षाने विशेष दक्षता घेतली असून, सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) अज्ञातस्थळी नेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

नाशिक : राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात आणि भाजपच्या नगरसेवकांत फोडाफोडीचे राजकारण होऊ शकत असल्याने त्यामुळे पक्षाने विशेष दक्षता घेतली असून, सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) अज्ञातस्थळी नेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या सर्वांची जबाबदारी पक्षाच्या तीन आमदारांना देण्यात आली आहे.महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. या पक्षाचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांतील सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपला सत्तेवर खेचण्यासाठी आणखी काही नगरसेवकांची गरज आहे. भाजपत सध्या राजी नाराजीचे वातावरण असून, काही जण हे पक्षाने उमेदवारी नाकारलेले आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असल्याने भाजपलादेखील निवडणूक आव्हानात्मक आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यास नाशिकमध्ये मिशन शिवआघाडी राबविले जाऊ शकते हे लक्षात घेऊन भाजपच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली असून, सर्व नगरसेवकांना शहराबाहेर नेण्याची तयारी करण्यात आली आहे.भाजपतील काही इच्छुकांनी शुक्रवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) सकाळी रामायण येथे बोलविण्यात आले असून, तेथून सर्वांना घेऊन अज्ञात ठिकाणी सहलीवर नेण्यात येणार असून, त्याठिकाणी भक्कम तटबंदी उभारली जाणार आहे. सध्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार असल्याने नगरसेवकांना सहलीवर नेणे आणि त्यांना निवडणुकीपर्यंत सांभाळणे याची जबाबदारी पक्षाच्या आमदारांवर देण्यात आली असून, त्यामुळेच आता भाजपची सत्ता वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.महासभेचे काय होणार?महापौर रंजना भानसी यांच्या कारकिर्दीतील शेवटची महासभा येत्या मंगळवारी (दि.१९) होणार आहे. मात्र या सभेसाठी भाजपचे मोजकेच पदाधिकारी आणि इच्छुक वगळता कोणीही हजर असणे कठीण आहे त्यामुळे ही सभा बोलवल्यानंतर कशी चालवली जाणार या विषयी शंका आहे. विशेषत: या सभेतच शिक्षण समितीचे नऊ सदस्य घोषित केल्यानंतर मनपाची सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येण्यासह अन्य प्रशासकीय विषय असणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारणBJPभाजपा