शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीच्या धास्तीने भाजप नगरसेवक आज सहलीवर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:26 IST

राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात आणि भाजपच्या नगरसेवकांत फोडाफोडीचे राजकारण होऊ शकत असल्याने त्यामुळे पक्षाने विशेष दक्षता घेतली असून, सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) अज्ञातस्थळी नेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

नाशिक : राज्यातील सत्ता समीकरणे बदलण्याची चिन्हे असल्याने नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात आणि भाजपच्या नगरसेवकांत फोडाफोडीचे राजकारण होऊ शकत असल्याने त्यामुळे पक्षाने विशेष दक्षता घेतली असून, सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) अज्ञातस्थळी नेण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या सर्वांची जबाबदारी पक्षाच्या तीन आमदारांना देण्यात आली आहे.महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. या पक्षाचे ६५ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षांतील सर्व पक्ष एकत्र आले तरी भाजपला सत्तेवर खेचण्यासाठी आणखी काही नगरसेवकांची गरज आहे. भाजपत सध्या राजी नाराजीचे वातावरण असून, काही जण हे पक्षाने उमेदवारी नाकारलेले आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असल्याने भाजपलादेखील निवडणूक आव्हानात्मक आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यास नाशिकमध्ये मिशन शिवआघाडी राबविले जाऊ शकते हे लक्षात घेऊन भाजपच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली असून, सर्व नगरसेवकांना शहराबाहेर नेण्याची तयारी करण्यात आली आहे.भाजपतील काही इच्छुकांनी शुक्रवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सर्व नगरसेवकांना शनिवारी (दि.१६) सकाळी रामायण येथे बोलविण्यात आले असून, तेथून सर्वांना घेऊन अज्ञात ठिकाणी सहलीवर नेण्यात येणार असून, त्याठिकाणी भक्कम तटबंदी उभारली जाणार आहे. सध्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार असल्याने नगरसेवकांना सहलीवर नेणे आणि त्यांना निवडणुकीपर्यंत सांभाळणे याची जबाबदारी पक्षाच्या आमदारांवर देण्यात आली असून, त्यामुळेच आता भाजपची सत्ता वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.महासभेचे काय होणार?महापौर रंजना भानसी यांच्या कारकिर्दीतील शेवटची महासभा येत्या मंगळवारी (दि.१९) होणार आहे. मात्र या सभेसाठी भाजपचे मोजकेच पदाधिकारी आणि इच्छुक वगळता कोणीही हजर असणे कठीण आहे त्यामुळे ही सभा बोलवल्यानंतर कशी चालवली जाणार या विषयी शंका आहे. विशेषत: या सभेतच शिक्षण समितीचे नऊ सदस्य घोषित केल्यानंतर मनपाची सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येण्यासह अन्य प्रशासकीय विषय असणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारणBJPभाजपा