शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत  भाजपा उमेदवार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:58 IST

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६) चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषित करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी ...

ठळक मुद्देराणेंविषयी योग्यवेळी निर्णय घेणार उमेदवारीबाबत अनिश्चितता अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार

नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६) चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषित करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने राणे  यांना भाजपाकडून मिळणाºया उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे़  विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी (दि़२७) अंतिम मुदत आहे़ त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपात प्रवेश करणारे नारायण राणे यांना भाजपा उमेदवारी देणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे़ पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेले खासदार रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी भाजपा ही निवडणूक स्वतंत्ररीत्या लढवित असून, त्यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे़ राणे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यामुळे त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही़  भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी शायना एऩ सी़, माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासह अन्य चार जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे़ या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री चर्चा करून त्यांची यादी केंद्रीय प्रदेश कार्यकारिणीला कळविण्यात येईल़ यानंतर केंद्राने मान्यता दिलेल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा सोमवारी (दि़२७) केली जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़ यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, केशव उपाध्ये, सुनील बागुल, सुहास फरांदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार व कर्जमाफीची रक्कमसरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असून, मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे़ त्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. लवकरच ती सर्वांना कळविण्यात येईल़ या मंत्रिमंडळात नाशिकला स्थान असेल का? या प्रश्नावर हास्य करीत उत्तर देण्याचे दानवे यांनी टाळले़ शेतकºयांच्या कर्जमाफीस उशीर झाल्याचे मान्य करून गतवेळच्या कर्जमाफीत बँकांनी केलेल्या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यामुळे हा उशीर झाला आहे़ सरकार ३४ हजार २०० कोटींची कर्जमाफी देण्यास बांधील असून, येत्या दोन-तीन दिवसांत २५ लाख शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत़ तसेच उशीर झाल्याने बँकेचे व्याजही सरकार भरणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़टीकेबाबत दानवेंचा ठाकरेंना टोमणामी लाभार्थीच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी झाल्याची टीका सांगली जिल्ह्णातील कार्वे (विटा) येथील शेतकरी संवाद मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली़ या टीकेबाबत दानवे यांना विचारले असता शिवसेना व भाजपा या दोघांचे प्रेम जगजाहीर असून, सरकार स्थापन झाल्यापासून ते व्यक्त होत आहे, यामध्ये नवीन काही नाही, असा टोमणा ठाकरे यांना मारला़ 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा