शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

कडवा कालव्याला पिण्याचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:18 IST

सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसह गावांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ...

सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसह गावांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना कडवा कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सोमवारी सायंकाळी कालव्याद्वारे शंभर क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावे व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कडवा पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने कडवा धरण ७ सप्टेंबरला ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे कडवा कालव्यातून पाणी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि, पावसाचा जोर वाढत नसल्याने कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी साशंक होते. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून मात्र लोकप्रतिनिधींना कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी साकडे घातले जात होते. कोकाटे यांनी मध्यंतरी जलसंपदा विभागाला सिन्नर तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली असल्याचे तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निदर्शनास आणून देत कालव्याला पाणी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी केली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्तन काळात एखाद्या गावाची पिण्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन आकस्मिक आरक्षण प्राप्त करुन दिल्यास त्याची पूर्तता केली जाईल, अशी माहिती उपअभियंता मिलिंद बागुल यांनी दिली. सोमवारी कालव्यास १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ३५० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता मिलिंद बागुल यांनी दिली. पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यातून सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

---------------------------

नद्या, नाले अद्याप कोरडेठाक

या कालव्यावर इगतपुरी, नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यातील ८ हजार ८११ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यापैकी सिन्नर तालुक्यात ४४९७ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला दमदार पाऊस वगळता तालुक्यात जेमतेम पाऊस झालेला आहे. नद्या, नाले अद्याप कोरडेठाक असून धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तथापि, कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील पंचाळे व १४ गावे, खडांगळी, कीर्तांगळी, कोमलवाडी, पांगरी, हिवरगाव, पिंपळगाव, रामपूर आदी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.