शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कडवा कालव्याला पिण्याचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:18 IST

सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसह गावांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ...

सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसह गावांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांना कडवा कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सोमवारी सायंकाळी कालव्याद्वारे शंभर क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावे व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कडवा पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण काहीसे वाढल्याने कडवा धरण ७ सप्टेंबरला ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे कडवा कालव्यातून पाणी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तथापि, पावसाचा जोर वाढत नसल्याने कालव्याद्वारे आवर्तन सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी साशंक होते. शेतकऱ्यांसह ग्रामस्थांकडून मात्र लोकप्रतिनिधींना कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी साकडे घातले जात होते. कोकाटे यांनी मध्यंतरी जलसंपदा विभागाला सिन्नर तालुक्यात पुरेसा पाऊस नसल्याने पिके करपण्याची भीती निर्माण झाली असल्याचे तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निदर्शनास आणून देत कालव्याला पाणी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी केली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्तन काळात एखाद्या गावाची पिण्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन आकस्मिक आरक्षण प्राप्त करुन दिल्यास त्याची पूर्तता केली जाईल, अशी माहिती उपअभियंता मिलिंद बागुल यांनी दिली. सोमवारी कालव्यास १०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने ३५० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता मिलिंद बागुल यांनी दिली. पावसाचा जोर कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यातून सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

---------------------------

नद्या, नाले अद्याप कोरडेठाक

या कालव्यावर इगतपुरी, नाशिक, निफाड व सिन्नर तालुक्यातील ८ हजार ८११ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यापैकी सिन्नर तालुक्यात ४४९७ हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला दमदार पाऊस वगळता तालुक्यात जेमतेम पाऊस झालेला आहे. नद्या, नाले अद्याप कोरडेठाक असून धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. तथापि, कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील पंचाळे व १४ गावे, खडांगळी, कीर्तांगळी, कोमलवाडी, पांगरी, हिवरगाव, पिंपळगाव, रामपूर आदी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.