शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जैवविविधतेसाठी निसर्गातील काजवा वाचविण्याची गरज !

By अझहर शेख | Updated: May 22, 2019 00:50 IST

मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो....

नाशिक : मानवाला निसर्गाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे, कारण निसर्ग तेवढा अद्भुत आहे. निसर्गातील लहानशा कीटकापासून प्राण्यापर्यंत सर्व काही देखणेच. असाच एक लहानसा जीव वर्षभरातून एकदाच पृथ्वीतलावर अवतरतो.... मनमुरादपणे काळ्याकुट्ट अंधारात लखलखतो तो काही दिवसांसाठी... वर्षा आरंभ होताच निसर्गाची ही प्रकाशफुले विझतात ती कायमचीच... काजवा बघण्यासाठी माणसांची जशी झुंबड कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य असलेल्या भंडारदरा परिसरात उडते, तशी काजवा वाचविण्यासाठीही माणसालाच धडपड करावी लागणार आहे, अन्यथा हा दुर्मीळ अन् आकर्षक असा कीटक जैवविविधतेतून कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका आहे.मे महिन्याच्या अखेरचा आठवडा सुरू झाला असून, निसर्गप्रेमी तसेच व्यावसायिकांकडून ‘काजवा महोत्सव’चे ब्रॅन्डिंगचे सोशल मीडियावर पेव फुटले. सुदैवाने संयुक्त राष्टÑाकडून याच महिन्यात अखेरच्या आठवड्यात जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्याबाबत घोषित केले गेले आहे. या दिनाच्या निमित्ताने तरी काजवा वाचविण्यासाठी आपण मनुष्य म्हणून काय करू शकतो, याचा कृतिशील विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारदरा परिसरातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत दरवर्षी काजव्यांचा लखलखाट बघण्यासाठी हजारो ते लाखो लोकांची गर्दी रात्रीच्या अंधारात उसळते. या गर्दीमध्ये नाशिककरांची संख्याही लक्षणीय असते. बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण वेळीच आणणे गरजेचे आहे, मात्र सरकारी यंत्रणा यासाठी अपयशी ठरताना दिसून येते. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वनियोजन करणे तितकेच आवश्यक आहे, परंतु त्याबाबत नाशिक वन्यजीव विभागाची उदासीनता कायम आहे.निशाचर जैवविविधतेवर ‘संक्रांत’काजवा महोत्सवाच्या निमित्ताने अभयारण्यक्षेत्रात पर्यटकांचा वाढता धिंगाणा, मद्यपींच्याओल्या पार्ट्या, चारचाकी मोटारींचा लख्ख प्रकाशअन् हॉर्नचा गोंगाट यामुळे महिनाभर अभयारण्यातील निशाचर प्राणी-पक्ष्यांची जैवविविधताधोक्यात सापडते. जणू आपल्या हक्काच्या अधिवासावर मानवाने हल्लाच चढविला आहे कीकाय असाच भास या क्षेत्रातील मुक्या वन्यजिवांचाहोत असावा....तर डोळ्यांपुढे ‘काजवे’ चमकतीलनिसर्गात बागडताना त्याचा आनंद लुटताना बेभान होऊन चालणार नाही याचा विसर माणसाला काजव्यांच्या दुनियेत पाऊल ठेवताना हमखास पडतो. निसर्ग व त्यामधील जैवविविधता दीर्घकाळ टिकवायची असेल तर भानावर राहून त्याचा आनंद घ्यावा लागेल, अन्यथा वैश्विक तपमान वृद्धीच्या स्वरूपात पर्यावरणाचा बिघडत जाणारा समतोलाच्या रूपाने आताच जगापुढे ‘काजवे चमकायला लागले’ आहे, हे तितकेच खरे.या प्रजातीच्या रोपांची हवी लागवडअभयारण्यातील वृक्षसंपदेवर काजव्यांचे नृत्य काळोखात सुरू असते; मात्र काजवे अधिकाधिक पसंती काही निवडक प्रजातीला देतात. त्यामध्ये भारतीय प्रजाती बेहडा, हिरडा, सादडा, जांभूळ, उंबर अशा झाडांवर काजव्यांचा अधिवास मोठ्या संख्येने पहावयास मिळतो. यामुळे आपापल्या परिसरातील मोकळ्या भूखंडांवर येत्या पर्यावरणदिनाच्या निमित्ताने वरील प्रजातीच्या रोपांची लागवड व संवर्धन करण्यावर भर दिल्यास काजवे शहराच्या आजूबाजूलाही चमकतांना दिसतील.पायी भ्रमंतीला प्राधान्य द्यावेचारचाकी किंवा दुचाकीवर फेरफ टका मारून काजव्यांच्या दुनियेचा आनंद घेता येतो हा गैरसमज निसर्गप्रेमींनी प्रथमत: दूर करायला हवा. वन्यजीव विभागाने निश्चित केलेल्या वाहनतळामध्ये शिस्तीने वाहने उभी करून पायी भ्रमंती करत काजव्यांनी लखलखले झाड बघावे. काजव्यांनी उजळून निघालेल्या झाडांवर फोटोसाठी दगड, माती फेक ण्याचा प्रयत्न करू नये. नाशिक वन्यजीव विभागासह राजूर पोलिसांनीदेखील महिनाभरासाठी भंडारदरा-राजूर, भंडारदरा-रतनवाडी, शेंडी-घाटघर या मार्गांवर गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसNashikनाशिक