शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा समाधानी : आॅगस्ट ते डिसेंबर महिन्यात सर्वाधिक आवक येवल्यात कांदा @ 3610

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:52 IST

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे.

ठळक मुद्देबळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया कांद्याची आवक तीनपट वाढली

येवला : येवला व अंदरसूल मार्केटच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यंदा आॅगस्ट ते डिसेंबर या सलग पाच महिन्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊनदेखील भावात सतत तेजी राहिल्याने बळीराजा समाधानी असल्याचे चित्र गेल्या पाच महिन्यांपासून दिसत आहे.येवला बाजार आवारात शुक्रवारी (दि. ५) १४ हजार क्विंटल आवक झाली. त्यात ३६१० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. लगतच्या पाच राज्यांत अतिपावसाने थैमान घातल्याने कांदा पीक पुरते संपुष्टात आल्याने, देशांतर्गत कांद्याची गरज भागविण्याची जबाबदारी निसर्गानेच महाराष्ट्रावर टाकली आहे.कांद्याचे भाव रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. परंतु देशातील मागणी आणि पुरवठा यांचे समीकरण न जुळल्याने शेतकºयाच्या कांद्याला यंदा सलग पाच महिने चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बळीराजाला समाधानी ठेवण्याची किमया अखेर निसर्गानेच केली. येवला बाजार आवारात शुक्रवारी १४ हजार क्विंटल आवक झाली. त्यात ३६१० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने बळीराजा समाधानी आहे. येवला गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये कांद्याची आवक तीनपट वाढली होती. एप्रिल महिन्यात दोन लाख ३० हजार क्विंटल आवक झाली. निरंतर आवकेत वाढच होत आहे. एप्रिलमध्ये सरासरी केवळ ३६० रुपये प्रतिक्विंटल भाव, तर मेमध्ये कांद्याचे बाजारभाव केवळ ३२५ रुपये प्रतिक्विंटल झाले. तुलनेत निम्म्याने भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळाले होते आणि शेतकरी आगीतून फुफाट्यात पडला होता. परंतु आॅगस्ट २०१७ पासून कांद्याला चांगले दिवस आले. नाशिक, पुणे, नगर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील कांदा संपूर्ण देशात कांद्याची गरज भागवण्यासाठी वापरला जात आहे. मध्य प्रदेशात कांदा गडगडल्याने तेथील राज्य शासनाने ८०० रुपये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला. तोच कांदा शासनाने झळ खावून ३०० ते ३५० रुपयाने बाजारात आणला. हाच मध्य प्रदेशातील अतिरिक्त माल देशभर पोहचला. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहिले. १० जुलैला मध्य प्रदेश शासनाने हमीभावाची कांदा खरेदी बंद केली. शिवाय देशात, राजस्थान, गुजरात, आसाम, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यात पुरामुळे कांदा पुरता नष्ट झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आणि कांद्याला चांगले दिवस आले.