शहरं
Join us  
Trending Stories
1
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
2
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
3
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
4
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
5
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
6
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
7
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
8
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
9
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
10
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
11
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
12
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
13
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
14
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
15
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
16
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
17
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
18
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
19
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
20
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री

बिहारचा निकाल; केंद्राला चपराक

By admin | Updated: November 9, 2015 21:56 IST

राधाकृष्ण विखे-पाटील : ही तर परिवर्तनाची नांदी; राज्याला सूचक इशारा

नाशिक : देशातील असहिष्णुतेचे वातावरण, केंद्र सरकारचे सर्व आघाड्यांवरील अपयश यामुळे बिहारच्या जनतेने महाआघाडीला कौल दिला आहे़ सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारविरोधात परिवर्तनाची ही नांदी असून, यातून केंद्र सरकारला बिहारी जनतेने चांगलीच चपराक दिली असून, महाराष्ट्रातील राज्य सरकारलाही यातून सूचक इशारा मिळेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले़ बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पत्रकारांशी ते बोलत होते़विखे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गत बिहार विधानसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या होत्या़ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये केलेल्या प्रचारामुळे काँग्रेस पक्ष १८ जागांवर पोहोचला़ दिल्ली विधानसभेनंतर बिहारमध्येही भाजपचे पानिपत झाले असून, हा निकाल म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे़ निवडणुकीचा हा निकाल लोकचळवळीवर शिक्कामोर्तब करणारा असून, तिरस्कारावर प्रेमाने विजय असे या निकालाचे विश्लेषण करता येईल़ केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारही सर्व आघाड्यांवर अपयशी ठरते आहे़ या सरकारच्या वर्षपूर्तीचे मूल्यमापन म्हणजे समाजशास्त्राच्या पेपरमध्ये भूगोलाचे उत्तर लिहिण्यासारखेच आहे़ मराठवाड्यातील विद्यार्थिनीने बस पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्त्या केल्यानंतर राज्य सरकारला जाग आली व मोफत पास योजना सुरू केली़ इतरत्र अशीच परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्येची सरकार वाट बघते आहे की काय? यातून सरकारचा असंवेदनशीलपणा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यातही राज्य सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे विखे-पाटील म्हणाले़ यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)