शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

बिहारचा निकाल; केंद्राला चपराक

By admin | Updated: November 9, 2015 21:56 IST

राधाकृष्ण विखे-पाटील : ही तर परिवर्तनाची नांदी; राज्याला सूचक इशारा

नाशिक : देशातील असहिष्णुतेचे वातावरण, केंद्र सरकारचे सर्व आघाड्यांवरील अपयश यामुळे बिहारच्या जनतेने महाआघाडीला कौल दिला आहे़ सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारविरोधात परिवर्तनाची ही नांदी असून, यातून केंद्र सरकारला बिहारी जनतेने चांगलीच चपराक दिली असून, महाराष्ट्रातील राज्य सरकारलाही यातून सूचक इशारा मिळेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले़ बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पत्रकारांशी ते बोलत होते़विखे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गत बिहार विधानसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या होत्या़ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये केलेल्या प्रचारामुळे काँग्रेस पक्ष १८ जागांवर पोहोचला़ दिल्ली विधानसभेनंतर बिहारमध्येही भाजपचे पानिपत झाले असून, हा निकाल म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे़ निवडणुकीचा हा निकाल लोकचळवळीवर शिक्कामोर्तब करणारा असून, तिरस्कारावर प्रेमाने विजय असे या निकालाचे विश्लेषण करता येईल़ केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारही सर्व आघाड्यांवर अपयशी ठरते आहे़ या सरकारच्या वर्षपूर्तीचे मूल्यमापन म्हणजे समाजशास्त्राच्या पेपरमध्ये भूगोलाचे उत्तर लिहिण्यासारखेच आहे़ मराठवाड्यातील विद्यार्थिनीने बस पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्त्या केल्यानंतर राज्य सरकारला जाग आली व मोफत पास योजना सुरू केली़ इतरत्र अशीच परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्येची सरकार वाट बघते आहे की काय? यातून सरकारचा असंवेदनशीलपणा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यातही राज्य सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे विखे-पाटील म्हणाले़ यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)