शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बिहारचा निकाल; केंद्राला चपराक

By admin | Updated: November 9, 2015 21:56 IST

राधाकृष्ण विखे-पाटील : ही तर परिवर्तनाची नांदी; राज्याला सूचक इशारा

नाशिक : देशातील असहिष्णुतेचे वातावरण, केंद्र सरकारचे सर्व आघाड्यांवरील अपयश यामुळे बिहारच्या जनतेने महाआघाडीला कौल दिला आहे़ सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकारविरोधात परिवर्तनाची ही नांदी असून, यातून केंद्र सरकारला बिहारी जनतेने चांगलीच चपराक दिली असून, महाराष्ट्रातील राज्य सरकारलाही यातून सूचक इशारा मिळेल, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले़ बिहार विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील पत्रकारांशी ते बोलत होते़विखे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला गत बिहार विधानसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या होत्या़ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बिहारमध्ये केलेल्या प्रचारामुळे काँग्रेस पक्ष १८ जागांवर पोहोचला़ दिल्ली विधानसभेनंतर बिहारमध्येही भाजपचे पानिपत झाले असून, हा निकाल म्हणजे केंद्र सरकारचे अपयश आहे़ निवडणुकीचा हा निकाल लोकचळवळीवर शिक्कामोर्तब करणारा असून, तिरस्कारावर प्रेमाने विजय असे या निकालाचे विश्लेषण करता येईल़ केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारही सर्व आघाड्यांवर अपयशी ठरते आहे़ या सरकारच्या वर्षपूर्तीचे मूल्यमापन म्हणजे समाजशास्त्राच्या पेपरमध्ये भूगोलाचे उत्तर लिहिण्यासारखेच आहे़ मराठवाड्यातील विद्यार्थिनीने बस पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्त्या केल्यानंतर राज्य सरकारला जाग आली व मोफत पास योजना सुरू केली़ इतरत्र अशीच परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्येची सरकार वाट बघते आहे की काय? यातून सरकारचा असंवेदनशीलपणा समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यातही राज्य सरकारला अपयश आले आहे. राज्य सरकारला ‘मेक इन महाराष्ट्र’ म्हणजे नेमके काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे विखे-पाटील म्हणाले़ यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, हेमलता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)