शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भाजपमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 01:14 IST

विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरासह जिल्ह्यात यश मिळाले असले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरासह जिल्ह्यात यश मिळाले असले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपने संघटनात्मक बदल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रमच जाहीर करण्यात आला असून, शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाशिक भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष बाळासाहेब पालवे हे तीन महिन्यांपूर्वीच निवडण्यात आले आहेत, तर जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांना मुदत संपूनही मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु आता संघटनात्मक निवडणुका सुरू होत असून,१० डिसेंबरच्या आत नूतन शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्ष निवडण्यात येणारआहे.दि. १० ते २० नोव्हेंबर दरम्यान सदस्य नोंदणी होणार असून, २४ नोव्हेंबरपर्यंत सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान बूथ अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडप्रक्रिया घेतल्या जातील. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत मंडल अध्यक्षांच्या निवडणुका घेण्यात येतील आणि त्यानंतर १० डिसेंबरपर्यंत सर्व शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांची निवडप्रक्रिया पार पडेल. याच दरम्यान, प्रदेश प्रतिनिधींचीदेखील निवडप्रक्रिया पार पडणार आहे.नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांत जिल्हाध्यक्ष बदलण्याची गरज पडली नाही, मात्र त्यानंतरदेखील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांना मुदतवाढ मिळाली. दुसरीकडे भाजपने तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून मात्र पद काढून घेतले होते. त्यांच्या कामकाजाविषयी तक्रारी करण्यात आल्यानंतर निवडणुका समोर असतानाही सानप यांचे पंख छाटण्यात आले आणि गिरीश पालवे यांची वर्णी लावण्यात आली होती. दरम्यान, आता पालवेंना मुदतवाढ मिळेल किंवा नाही याविषयी साशंकता आहे. पक्षातील त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ सुनील केदार, उत्तमराव उगले, विजय साने, महेश हिरे यांच्यासह अन्य अनेकांची नावे चर्चेत आहेत.ज्येष्ठांची शक्यताराज्यात सत्ता असताना भाजपने संघटनात्मक दृष्टीने फारसे लक्ष दिले नसले तरी आता मात्र राज्यातील अवस्था बघून संघटनेकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून, त्यामुळेच पक्षातील ज्येष्ठांनाच या पदावर नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक