शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निर्भिड, निष्पक्ष पत्रकाराच्या जाण्याने समाजाची मोठी हानी, शोकसभेत गणेश धुरींच्या आठवणींनी नाशिककर हळहळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:31 IST

नाशिक : पत्रकार समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकताना कोणाचीही भीड न बाळगता निष्पक्षपणे वार्ताकन करीत असतो. विविध आव्हानात्मक स्थितीला समाजाने, समाजप्रतिनिधींनी कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शनही करतो. ही समाज मार्गदर्शकाची भूमिका समर्थपणे पेलतांना गणेश धुरी यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रत कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. अशा निर्भिड व ...

ठळक मुद्देगणेश धुरी यांच्या अकाली जाण्याने नाशिककर हळहळले शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे पाठवला शोकसंदेश

नाशिक : पत्रकार समाजातील विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकताना कोणाचीही भीड न बाळगता निष्पक्षपणे वार्ताकन करीत असतो. विविध आव्हानात्मक स्थितीला समाजाने, समाजप्रतिनिधींनी कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शनही करतो. ही समाज मार्गदर्शकाची भूमिका समर्थपणे पेलतांना गणेश धुरी यांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रत कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले. अशा निर्भिड व निष्पक्ष पत्रकाराच्या अकाली निधनामुळे समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाल्याच्या भावना विविध क्षेत्रतील मान्यवरांनी रावसाहेब थोरात सभागृहातील शोकसभेत व्यक्त केल्या.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक गणेश कृष्णराव धुरी यांचे बुधवारी रात्री अपघातात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शानिवारी (दि.9) नाशिक जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा परिषदेतील त्यांचे स्नेही व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. गणेश धुरी यांच्या आठवणींना उजाळा देतांना नाशिक शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारीता आदि विविध क्षेत्रतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. धुरी यांनी समाजात कौटुंबिक जिव्हाळ्य़ाचे संबध तयार केल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने जिल्हा परिषदेतील महिला वर्गात बंधुत्वाचे नाते निर्माण केल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व उपाध्यक्ष नयना गावीत म्हणाल्या.यावेळी महापौर रंजना भानसी,आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अनिल कदम, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी मंत्री शोभा बच्छाव, महाराष्ट्र पत्रकार संघाचे सरचिटणीस यशवंत पवार, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी आमदार शिरिश कोतवाल, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार,माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, आरपीआय नेते प्रकाश पगारे, माजी सभापती प्रकाश वडजे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य अधिकारी अनिरुद्ध लांडगे, अधिकारी महासंघाचे बाळासाहेब घोरपडे यांनीही याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही पत्रद्वारे शोकसंदेश पाठवून धुरींच्या निधनामुळे दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली.भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा यांनी धुरी यांच्या निधनानंतर कुटुंबाला आश्वासक पाठबळ देण्यासाठी समाजप्रतिनिधींनी पुढे येण्याचे आवाहन केले. तर लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी गणोश धुरींच्या दु:खद निधनानंतर लोकमत वृत्तपत्रसह समाजही कुटुंबासोबत उभा राहिल्याने त्यांच्या कटुंबाला दुख:तून सावरण्याचे बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली. तसेच समाजातील विविध क्षेत्रतील सक्षम व्यक्तींनी धुरी यांच्या कुटुंबाला स्थायी स्वरुपाची मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिक्षण समिती सभापती यतींद्र पगार, क्राँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक विलास शिंदे, राष्ट्रवादीचे दिलीप खैरे, शिवसेनेचे उदय सांगळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णा पाटील बोरगुडे, प्रेस युनीयनचे जगदीश गोडसे आदिंसह विविध पत्रकार तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Journalistपत्रकारDeathमृत्यू