शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे यंत्रणेपुढील मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 15:05 IST

शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर

ठळक मुद्देबेघर, निराश्रितांचे काय? ही मंडळी अजूनही उघड्यावरच मनपा शाळांच्या इमारतींचा व्हावा वापर

नाशिक : कोरोनाचा प्रसार शहरासह जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस, मनपा प्रशासनदेखील युध्दपातळीवर सतर्कता घेत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत, मात्र शहरातील बेघर, निराश्रित मात्र अद्यापही उघड्यावरच असून त्यांनी ‘निवारा’ शोधायचा कोठे अन् कसा हा यक्षप्रश्न कायम आहे.कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये, म्हणून नागरिकांनी घरांमध्येच थांबावे, असे आवाहन केले जात आहेत. जे विनाकारण घरातून बाहेर पडत आहेत, त्यांच्यावर दंडुकाही उगारला जात आहे, अन् ते स्वभाविकही आहे; मात्र ज्या नागरिकांचे कोणतेही घर नाही, जे वर्षानुवर्षांपासूनच गोदामाईच्या कुशीत दिवस-रात्र काढत आले, अशा बेघर, निराश्रितांचे काय? ही मंडळी अजूनही उघड्यावरच वास्तव्यास आहे. कोरोनाचा धोका यामुळे अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निराश्रितांच्या आरोग्याचीही खूप काही चांगली अवस्था नसते. महापालिकेचे निवारागृहदेखील कुलूपबंद अवस्थेत आहेत. त्यामुळे निराश्रीतांनी जायचे कोठे अन् कोरोनापासून खबरदारी घ्यायची कशी? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह वैद्यकिय सेवा देणाऱ्या यंत्रणांनी आता गोदाघाट परिसरात सर्रासपणे वावरणाºया बेघरांकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे अन्यथा कोरोनाची पहिली शिकार बेघरांपैकी एखादी व्यक्ती ठरू शकते,असेही बोलले जात आहे.शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर परतले. बेघरांना चार भींतीत ठेवण्याचे मोठे आव्हान शासकिय यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूने बेघर व्यक्तींना जर संक्रमित केले तर मोठा अनर्थ होऊ शकतो, कारण बेघर हे सर्रासपणे शहरांमधील गल्लीबोळात भटकंती क रत असतात. त्यामुळे या बेघरांना चार भिंतींच्या आत ठेवून त्यांना वेळोवेळी अन्नपाणी पुरविणे गरजेचे आहे. बेघर घरांमध्ये गेले तर कोरोनाचा प्रादूर्भावाची शक्यता अधिकाधिक कमी होईल, आणि नाशिक असेच अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.मनपा शाळांच्या इमारतींचा व्हावा वापरशाळांना बेमुदत सुटी जाहीर असून महापालिका शाळांच्या इमारतीसुध्दा ओस पडल्या आहेत. शहर व परिसरात फिरणाºया बेघर, निराश्रितांना या शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये आश्रय दिला जावा, अशी मागणी होत आहे. मनपा शाळांच्या इमारतींचा वापर बेघरांच्या तात्पुरत्या निवाºयासाठी करण्यास हरकत नसून यासाठी प्रशाासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgodavariगोदावरी