शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ नव्या सरकारला म्हणाले,‘ नांदा सौख्य भरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 01:46 IST

महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

ठळक मुद्देयेवल्यात मेळावा : सत्ता बदलली तरी विकास थांबणार नाही

येवला : महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

येथील राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, सत्ता असली आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम नेहमी आहे. हे कधी कुणी हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली तरी येवल्याचा विकास कधीही थांबू देणार नाही.

नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिली. मी लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात निधी द्या, त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा, असे आदेश दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून ऑनलाइन बैठका घेतल्या. आता केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. यातील कुठलेही काम रद्द होणार नाही, असा विश्वासही भुजबळ यांनी दिला. शिवसेना जरी अडचणीत आली असली तरी पवार साहेब व सर्व महाविकास आघाडी सरकारमधील घटक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांना आधार द्यावा, असे भावनिक आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ॲड. बाबासाहेब देशमुख, जयदत्त होळकर, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, हुसेन शेख, महेंद्र काले, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अकबर शहा, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, प्रसाद पाटील, साहेबराव आहेर, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर कदम, विलास गोऱ्हे, बाळासाहेब दाणे, सचिन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इन्फो

ईडीच्या धाकापोटीच अनेकजण भाजपसोबत

 

अनेक जण ईडीच्या धाकापोटीच भाजपासोबत गेले असल्याचे भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन केले असून, अनेकांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी असे कोणालाही वाटत नसून बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संपावी, असे मलाही वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ