शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भुजबळ नव्या सरकारला म्हणाले,‘ नांदा सौख्य भरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 01:46 IST

महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

ठळक मुद्देयेवल्यात मेळावा : सत्ता बदलली तरी विकास थांबणार नाही

येवला : महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

येथील राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, सत्ता असली आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम नेहमी आहे. हे कधी कुणी हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली तरी येवल्याचा विकास कधीही थांबू देणार नाही.

नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिली. मी लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात निधी द्या, त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा, असे आदेश दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून ऑनलाइन बैठका घेतल्या. आता केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. यातील कुठलेही काम रद्द होणार नाही, असा विश्वासही भुजबळ यांनी दिला. शिवसेना जरी अडचणीत आली असली तरी पवार साहेब व सर्व महाविकास आघाडी सरकारमधील घटक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांना आधार द्यावा, असे भावनिक आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ॲड. बाबासाहेब देशमुख, जयदत्त होळकर, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, हुसेन शेख, महेंद्र काले, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अकबर शहा, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, प्रसाद पाटील, साहेबराव आहेर, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर कदम, विलास गोऱ्हे, बाळासाहेब दाणे, सचिन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इन्फो

ईडीच्या धाकापोटीच अनेकजण भाजपसोबत

 

अनेक जण ईडीच्या धाकापोटीच भाजपासोबत गेले असल्याचे भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन केले असून, अनेकांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी असे कोणालाही वाटत नसून बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संपावी, असे मलाही वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ