शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

भुजबळ नव्या सरकारला म्हणाले,‘ नांदा सौख्य भरे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 01:46 IST

महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

ठळक मुद्देयेवल्यात मेळावा : सत्ता बदलली तरी विकास थांबणार नाही

येवला : महाविकास आघाडीचे, जनतेच्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत, असा सल्ला देत हे सरकार किती दिवस कार्यरत राहील यापेक्षा ‘नांदा सौख्य भरे’ अशा खास शैलीत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.

येथील राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, सत्ता असली आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम नेहमी आहे. हे कधी कुणी हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली तरी येवल्याचा विकास कधीही थांबू देणार नाही.

नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिली. मी लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात निधी द्या, त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा, असे आदेश दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून ऑनलाइन बैठका घेतल्या. आता केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. यातील कुठलेही काम रद्द होणार नाही, असा विश्वासही भुजबळ यांनी दिला. शिवसेना जरी अडचणीत आली असली तरी पवार साहेब व सर्व महाविकास आघाडी सरकारमधील घटक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांना आधार द्यावा, असे भावनिक आवाहनही भुजबळ यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, ॲड. बाबासाहेब देशमुख, जयदत्त होळकर, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, हुसेन शेख, महेंद्र काले, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ, मोहन शेलार, अकबर शहा, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, डॉ. श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, प्रसाद पाटील, साहेबराव आहेर, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर कदम, विलास गोऱ्हे, बाळासाहेब दाणे, सचिन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इन्फो

ईडीच्या धाकापोटीच अनेकजण भाजपसोबत

 

अनेक जण ईडीच्या धाकापोटीच भाजपासोबत गेले असल्याचे भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो. नाशिकमधील अनेक शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन केले असून, अनेकांना मी शाखाप्रमुख म्हणून नेमले आहे. त्यामुळे ही संघटना संपावी असे कोणालाही वाटत नसून बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना संपावी, असे मलाही वाटत नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळ