शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

भुजबळांच्या येवल्यातही फटाके लागले फुटू...!

By किरण अग्रवाल | Updated: June 23, 2019 01:29 IST

भुजबळ यांना येवल्याचा रस्ता दाखविणाऱ्या माणिकराव शिंदे यांनी विधानसभेसाठी पुन्हा दंड थोपटून भुजबळांकडेच उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे भुजबळ माघारी फिरतील अशी शक्यता नसली तरी राजकीय वातावरण बदलते आहे याचा संकेत यातून घेता यावा. कारण तो येवल्यातच नव्हे, नांदगावातही राजकारण ढवळू शकणारा आहे.

ठळक मुद्दे माणिकराव शिंदे यांच्या आमदारकीच्या अपेक्षांना नव्याने फुटले धुमारे आता घड्याळाचे काटे कसे फिरतात याची उत्सुकता समीर भुजबळ यांच्या पराभवानंतर येवल्यातील गणिताची फेरमांडणी

सारांशदिवाळी उलटून गेल्यानंतर पडून राहिलेले फटाके उशिराने अगर पुढच्या दिवाळीला फोडायला घेतले तर ते सादडलेले निघण्याचा धोका असतो. पण राजकारणात पडून राहिलेले असोत, की नवीन; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सारे फटाके फुटणारेच निघतात, कारण भविष्यकालीन अपेक्षांबरोबर भूतकालीन अपेक्षाभंगाचा दारूगोळा कधी सादळत नसतो. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांच्या येवल्यात जे राजकीय फटाके फुटू लागले आहेत, त्याकडे याच संदर्भाने बघता येणारे आहे.लोकसभा निवडणुकीतील समीर भुजबळ यांच्या पराभवानंतर येवल्यातील गणिताची फेरमांडणी करून बघण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तेथील भुजबळ समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना आता थांबण्याचा सल्ला देत आपल्याला उमेदवारी देण्याची अपेक्षा एका जाहीर विनंती पत्राद्वारे व्यक्त केली आहे. २००४मध्ये याच माणिकरावांनी भुजबळांना येवल्याचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर २००९ मध्ये तेच भुजबळांविरुद्ध शिवसेनेतर्फे लढून पराभूत झाले व पुन्हा भुजबळांच्या साथीला गेले. परंतु आता अपेक्षावजा उपेक्षेचा फटाका त्यांनी फोडून दिल्याने येवल्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकीय परिघावरील वातावरण तापून जाणे स्वाभाविक ठरले आहे.मुळात माणिकराव शिंदे यांची आमदारकीची अपेक्षा लपून राहिलेली नाही. तालुक्यातील राजकीय शह-काटशहाचा भाग म्हणून, स्वत:च कबूल केल्याप्रमाणे अनेकांचे राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी भुजबळांना त्यांनी येवल्यात आणले; परंतु ते करताना त्यांच्या स्वत:च्या पदरात काही पडू शकले नाही. बघता बघता तीन पंचवार्षिक टर्म निघून गेल्या, दरम्यानच्या काळात शिंदेंचे स्पर्धक राहिलेले नरेंद्र दराडे शिवसेनेत जाऊन आमदारही बनले शिंदे आपले भुजबळ समर्थक म्हणून आहे तिथेच राहिले.शिंदे यांचे दु:ख वा अपेक्षाभंग असा की, आश्वासन लाभूनही त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही. एकदा नव्हे तर दोनदा असे झाले. त्यामुळे त्याबाबतची सल त्यांना बोचणे स्वाभाविक आहे. बरे, इकडे भुजबळ परतण्याची शक्यता नाही, आणि पुन्हा परपक्षात जाऊन बंडाचे निशाण फडकवायचे तर, तिथे जागा अगोदरच बुक झालेली. शिंदे यांना भुजबळांनाच विनंती करण्याची वेळ आली ती त्यामुळेच. पण प्रश्न असा उपस्थित होतो की, ते भुजबळ समर्थक असतील तर वैयक्तिक विनंती करण्याऐवजी पत्रोपचाराचा प्रदर्शनीपणा करण्याची गरज त्यांना का भासली असावी? भुजबळांना खासगीत भेटून शिंदे आपली इच्छा बोलून दाखवू शकले असते; पण ते ऐकले जाईल याची खात्री नसल्याने व भुजबळांकडून दिले गेलेले आश्वासन पाळले न गेल्याचाच पूर्वानुभव असल्याने शिंदे यांनी आपल्या इच्छेचे जाहीर प्रकटीकरण केले. त्यामुळे ते बदलत्या राजकीय समीकरणात वेगळ्याच संकेतांची नांदी घडविणारे ठरू शकते.महत्त्वाचे म्हणजे राजकीय वातावरण बदलले आहे. लोकसभा निवडणुकीत मागे पडल्याने विरोधी पक्षात म्हणावा तितका त्राण उरलेला दिसत नाही. लोकसभेच्या नाशिकच्या जागेवर भुजबळांना लागोपाठ दुसऱ्यांदा पराभव बघावा लागला आहे. येवल्यात भुजबळांचेच समर्थक राहिलेले दराडे बंधू आता आमदार आहेत त्यांच्यासाठी शिंदे यांनी परिश्रम घेतलेले लपून राहिलेले नाही. मारोतराव पवारही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. अंबादास बनकर यांनी जणू राजकीय सेवानिवृत्ती घेतली आहे. मग भुजबळांसोबत उरले कोण? अर्थात, एके क करत नेते बाजूला होत असले तरी मतदारांचे बळ मात्र आपल्याच सोबत राखण्यात भुजबळ कसर ठेवणार नाहीत; पण म्हणून बदलत्या समीकरणांकडे त्यांनाही दुर्लक्ष करता येऊ नये. शिंदे यांनी आपले अपेक्षापत्र जाहीर केल्यानंतर भुजबळ यांनी केलेल्या येवला तालुका दौºयात काही ठिकाणी शिंदे समर्थकांनी त्यासंदर्भातली निवेदनेही दिली आहेत. याला बंडाची नांदी भलेही म्हणता येऊ नये; परंतु समर्थक राहून विरोधात वावरणाºयांचे लोण वाढणार असेल तर ते शेजारी पंकज भुजबळ प्रतिनिधित्व करीत असलेल्या नांदगावातही पोहोचू शकते. त्यामुळे राजकीय बांधबंदिस्तीकडे भुजबळांना लक्ष पुरविणे गरजेचे बनले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळElectionनिवडणूकSameer Bhujbalसमीर भुजबळ