शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भोजापूरचा गाळ उपसा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:23 IST

सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसिन्नर : पाणी साठवण क्षमता वाढविण्याची कळकळ केवळ बोलण्यापुरतीच

 

 

सचिन सांगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा होण्यासाठी लोकसहभाग मिळत नसल्याने धरणातील गाळ वर्षांनुवर्षे वाढत आहे. गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची गरज केवळ बोलघेवडी ठरत असून, प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. धरणातील टेकड्या व गाळ उपसून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याची गरज आहे.सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून उगम पावणाºया म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण असून, सुमारे ३६५ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता आहे. भोजापूर धरणावर परिसरातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. हे धरण परिसरासाठी वरदान ठरलेले आहे. धरणाची निर्मिती झाल्यापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता तसेच टेकड्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत चालली होती. धरणातील गाळ काढण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत ‘लोकमत’ने अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध केले होते.गेल्या वर्षी आमदार राजाभाऊ वाजे यांनी प्रस्ताव करून मेरी संस्थेमार्फत धरणातील गाळाचे सर्वेक्षण केले होते. त्या अहवालात धरणात १३ लाख ६७ हजार ४२८ घनमीटर गाळ साचला आहे, म्हणजे १२ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा कमी झाला असे नमूद करण्यात आले होते. आमदार वाजे यांनी पुढाकार घेऊन धरणातील गाळ काढण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत तयारी केली होती. पाटबंधारे विभागाने सुमारे ४० लाख ८६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या तालुकास्तर बैठकीत आमदार वाजे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता यांनी त्यास प्रशासकीय मान्यता दिली. सदरचे काम युवा मित्र, टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून केले जाणार होते. सदर कामाचा कार्यारंभ आदेशनिघाला होता. पहिल्या टप्प्यात धरणातून ३ लाख ६५ हजार ४७४ घनमीटर गाळाचा उपसा केला जाणार होता. भोजापूर धरणातील टेकड्या हटविल्यानंतर निश्चितच पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यासाठी लाभक्षेत्रातील नागरिक व शेतकºयांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गतवर्षी तालुक्यातील कोनांबे व ठाणगाव धरणातील गाळ लोकसहभागातून काढला आहे. या भागातील शेतकरी व नागरिकांनीसुद्धा यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. धरणातील गाळ व टेकड्या काढल्यानंतर ३० ते ४० दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता वाढू शकते.- एस. एस. गोंदकर, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभागलोकसहभाग नसल्याने अडली कामेगेल्या वर्षी धरणातील गाळ काढण्यासाठी युवा मित्र संस्थेने दोन पोकलेन व डंपर ही यंत्रसामग्री धरण क्षेत्रावर आणून ठेवली होती. गाळ उपसल्यानंतर शेतकºयांनी तो स्वखर्चाने आपल्या शेतात वाहून न्यायचा होता; मात्र गाळ वाहून नेण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आठ दिवसानंतर यंत्रसामग्री अन्यत्र हलविण्यात आली. त्यानंतर गाळ उपशाचे काम अद्याप सुरू झाले नाही. लोकसहभाग नसल्याने धरणातील गाळ उपसा रखडला आहे. भोजापूर धरण तालुक्यातील सर्वात मोठे धरण असल्याने धरण गाळमुक्त करण्याचा आपला मानस आहे. पाण्याची पातळी वाढवून लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्याचा फायदा होईल. भोजापूर धरणातील गाळ व टेकड्या काढण्यासंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. पहिल्या टप्प्यातील कामास गेल्या वर्षी सुरुवात होणार होती. आठ दिवस धरण क्षेत्रात यंत्रसामग्री उभी होती; परंतु शेतकरी व लोकसहभाग नसल्याने काम होऊ शकले नाही. गाळ वाहून नेण्यासाठी शेतकºयांनी पुढाकार घेतला पाहिजे.- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर