शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

भीमराज दराडे : पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत कार्यशाळा मूलभूत सुविधांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:12 AM

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी.

ठळक मुद्देतहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजनपोलिसांचे कामदेखील कमी होईल

येवला : ग्रामीण भागात प्रगतीसाठी रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांची अधिक गरज आहे. कोणतीही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवून परस्पर सहकार्याने योजनेची अंमलबजावणी करावी. यासाठी प्रशासन सर्व बाबतीत सहकार्य करण्यास बांधील असल्याचे प्रतिपादन भीमराज दराडे यांनी येथे केले. ग्रामीण शेतशिवारातील कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजनेची माहिती देण्यासाठी येथील महात्मा फुले नाट्यगृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे होते. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, येवला उपविभागीय अधिकारी कार्यालय, येवला तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक संस्थेच्या विनीता वाघ, सारिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी, पालकमंत्री योजनेंतर्गत शेतशिवारातील रस्ते झाले तर गावे तंटामुक्त होण्यास मदत होईल. पोलिसांचे कामदेखील कमी होईल. न्यायालयीन कामकाजातील शेतबांध व रस्ते यावरून असलेले वाद निकालात निघतील, असे मत मांडले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित गटविकास अधिकारी सुनील अहिरे, उपअभियंता वाघ, जलसंधारणच्या सहायक कार्यकारी अभियंता सोनल पाटील, बाळासाहेब लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी ए. ए. शेख, नायब तहसीलदार सविता पठारे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मजूर फेडरेशनचे माजी संचालक गोरख शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांना पालकमंत्री शेत- पाणंद रस्ते योजनेची प्रत्येक गावात यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या परिपत्रकाची प्रत देण्यात आली. कार्यशाळा यशस्वीतेसाठी संतोष तरटे, उत्तम खांडवे, शरद घाडगे, आनंद शंकपाळ, विजय चव्हाण, विशाल राऊत, विलास साबळे, रमेश कुंभार्डे, सुधीर पाटसकर यांनी परिश्रम घेतले. दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी आभार मानले.