शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

भाम प्रकल्पग्रस्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:32 AM

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय : पुनर्वसनाच्या प्रश्नावर आक्रमक

नाशिक : भाम धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झालेले नाही, धरणाच्या पायथ्याशी असूनही पिण्यासाठी पाणी नाही तर रस्ते, गटार या मूलभूत सुविधाही न देण्यात आल्याने इगतपुरी तालुक्यातील भरवज-निरपण येथील प्रकल्पग्रस्त महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक देऊन पुनवर्सन कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. अखेर येत्या २४ आॅगस्ट रोजी पुनर्वसित ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजावून घेण्यास प्रशासन तयार झाल्याने सायंकाळी ५ वाजता महिलांनी ठिय्या मागे घेतला.भाम धरणाची यंदा घळभरणी करण्यात आली असून, धरणात शंभर टक्के पाणी साठले आहे. तत्पूर्वी ४८० भाम धरणग्रस्तांचे मे महिन्यात भरवज-निरपण येथे स्थलांतर व पुनर्वसन करण्यात आले. आता मात्र पाऊस सुरू असल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, धरण पूर्णपणे भरल्याने धरणाच्या खालच्या बाजूला करण्यात आलेल्या पुनर्वसनाच्या घरांमध्ये जमिनीखालून पाण्याचे झरे निघू लागले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्यात आली, परंतु अजूनही नळांना पाणी येत नाही, त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असूनही महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. १५ आॅगस्ट रोजी प्रकल्पग्रस्तांनी नांदूरमधमेश्वर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी केली, परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी असंख्य महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली व्यथा मांडली. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व त्यानंतर त्यांनी पुनर्वसन कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या मांडला. काही ठिकाणी हातपंप करण्यात आले, परंतु ते नादुरुस्त आहेत. गटारींचे काम अपूर्ण असल्याने सांडपाणी वाहून जाण्याची सोय नाही. रस्तादेखील मातीचा असून, घोटी ते भरवज-निरपण हा नवीन रस्ता तयार करण्यात यावा, शेतजमिनीत बांधलेल्या घरासाठी विद्युत पुरवठा करण्यात यावा, प्रकल्पग्रस्तांचा दारिद्र्यरेषेत समावेश करण्यात यावा, अशा मागण्या आहेत.