शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:21 IST

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देतळमोरीच्या दुरुस्तीत यांत्रिकी विभागाला यश

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कळवण तालुक्यातील ओतूरसह सिंचन योजनांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत भेगू प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्यामुळे पाईप विमोचक दुरुस्ती करता येत नसल्याचे कारण दिले जाते, याकडे आमदार नितीन पवार यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी पाटील यांनी युद्ध पातळीवर प्रश्न सोडवून आदिवासी भागातील पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेने पाणबुड्याच्या साहाय्याने मंगळवारी युद्धपातळीवर उपाययोजना करुन पाईप विमोचकातून दगड धोंडे काढून पाणी सुरळीत करण्यात यश मिळविले असून येत्या दोन ते तीन दिवसात प्रकल्पातील पूर्ण पाणी काढण्याचे यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करुन सूचना दिल्या असून पाणी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा प्रकल्पस्थळावर तळ ठोकून बसणार आहे.पाणी आवर्तन सोडण्यात येत नसल्याने पाणी असून पाण्याचा उपयोग होत नव्हता. एप्रिल, मे, जून महिन्यात पिकासाठी पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना या भागातील जनतेला करावा लागतो. दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्याचे कारण देत दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात होती. दरवर्षी भेगू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत होत्या. दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती विभागाकडे सोपविण्यात आले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊन सर्वांना पाणी मिळेल असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केला.राज्यातील पहिला प्रयोग २००० मध्ये यशस्वीगुजरात राज्यालगत कळवण तालुक्यात मांगलीदर पाड्याजवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी भेगू नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी मांगलीदर गावाजवळ माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे भेंगू लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून अडविले. तेथून कालव्याद्वारे गिरणा खोऱ्यात पाणी वळवून पश्चिम वाहिनी नदीचे पाणी पूर्व वाहिनी करून त्या पाण्याचा २० गावातील आदिवासी बांधवांना लाभ मिळवून दिला आहे . गुजरातला वाहून जाणारे पाणी कळवण तालुक्यात वळवून आणण्याचा राज्यातील पहिला प्रयोग स्व. पवार यांनी सन २००० मध्ये यशस्वी केल्यानंतर २०१६ पर्यंत पाणी सुरळीत असल्यामुळे या भागाला पाण्याचे आवर्तन मिळत होते. जानेवारी २०१६ मध्ये ल.पा.प्रकल्पाच्या पाईप मुखाशी दरड कोसळल्याने पाईप विमोचकामधून पाणी येणे बंद झाले. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून पाणबुड्याचा वापर करून पाणी सुरू करण्याचे प्रयत्न केले परंतु यश आले नव्हते. त्यामुळे या पाण्यापासून विरशेत ,मांगलीदर , चाफापाडा आदी २० गावातील आदिवासी बांधव वंचित झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.फोटो - ०१ कळवण १

टॅग्स :talukaतालुकाwater scarcityपाणी टंचाई