शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:21 IST

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देतळमोरीच्या दुरुस्तीत यांत्रिकी विभागाला यश

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कळवण तालुक्यातील ओतूरसह सिंचन योजनांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत भेगू प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्यामुळे पाईप विमोचक दुरुस्ती करता येत नसल्याचे कारण दिले जाते, याकडे आमदार नितीन पवार यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी पाटील यांनी युद्ध पातळीवर प्रश्न सोडवून आदिवासी भागातील पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेने पाणबुड्याच्या साहाय्याने मंगळवारी युद्धपातळीवर उपाययोजना करुन पाईप विमोचकातून दगड धोंडे काढून पाणी सुरळीत करण्यात यश मिळविले असून येत्या दोन ते तीन दिवसात प्रकल्पातील पूर्ण पाणी काढण्याचे यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करुन सूचना दिल्या असून पाणी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा प्रकल्पस्थळावर तळ ठोकून बसणार आहे.पाणी आवर्तन सोडण्यात येत नसल्याने पाणी असून पाण्याचा उपयोग होत नव्हता. एप्रिल, मे, जून महिन्यात पिकासाठी पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना या भागातील जनतेला करावा लागतो. दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्याचे कारण देत दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात होती. दरवर्षी भेगू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत होत्या. दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती विभागाकडे सोपविण्यात आले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊन सर्वांना पाणी मिळेल असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केला.राज्यातील पहिला प्रयोग २००० मध्ये यशस्वीगुजरात राज्यालगत कळवण तालुक्यात मांगलीदर पाड्याजवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी भेगू नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी मांगलीदर गावाजवळ माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे भेंगू लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून अडविले. तेथून कालव्याद्वारे गिरणा खोऱ्यात पाणी वळवून पश्चिम वाहिनी नदीचे पाणी पूर्व वाहिनी करून त्या पाण्याचा २० गावातील आदिवासी बांधवांना लाभ मिळवून दिला आहे . गुजरातला वाहून जाणारे पाणी कळवण तालुक्यात वळवून आणण्याचा राज्यातील पहिला प्रयोग स्व. पवार यांनी सन २००० मध्ये यशस्वी केल्यानंतर २०१६ पर्यंत पाणी सुरळीत असल्यामुळे या भागाला पाण्याचे आवर्तन मिळत होते. जानेवारी २०१६ मध्ये ल.पा.प्रकल्पाच्या पाईप मुखाशी दरड कोसळल्याने पाईप विमोचकामधून पाणी येणे बंद झाले. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून पाणबुड्याचा वापर करून पाणी सुरू करण्याचे प्रयत्न केले परंतु यश आले नव्हते. त्यामुळे या पाण्यापासून विरशेत ,मांगलीदर , चाफापाडा आदी २० गावातील आदिवासी बांधव वंचित झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.फोटो - ०१ कळवण १

टॅग्स :talukaतालुकाwater scarcityपाणी टंचाई