शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

भेगू प्रकल्पामुळे २० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:21 IST

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देतळमोरीच्या दुरुस्तीत यांत्रिकी विभागाला यश

कळवण :गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी अडवून कळवण तालुक्यात वळविण्यात येणाऱ्या भेगू प्रकल्पाच्या पाईप विमोचकातून दगड, धोंडे पाणबुड्याच्या साहाय्याने काढून पाणी सुरळीत करण्यात यांत्रिकी विभागाला यश आले. यामुळे परिसरातील २० गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात कळवण तालुक्यातील ओतूरसह सिंचन योजनांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत भेगू प्रकल्पात दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्यामुळे पाईप विमोचक दुरुस्ती करता येत नसल्याचे कारण दिले जाते, याकडे आमदार नितीन पवार यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी पाटील यांनी युद्ध पातळीवर प्रश्न सोडवून आदिवासी भागातील पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकी विभागाच्या यंत्रणेने पाणबुड्याच्या साहाय्याने मंगळवारी युद्धपातळीवर उपाययोजना करुन पाईप विमोचकातून दगड धोंडे काढून पाणी सुरळीत करण्यात यश मिळविले असून येत्या दोन ते तीन दिवसात प्रकल्पातील पूर्ण पाणी काढण्याचे यंत्रणेचे उद्दिष्ट आहे. दरम्यान मंगळवारी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी करुन सूचना दिल्या असून पाणी सुरळीत करण्यासाठी यंत्रणा प्रकल्पस्थळावर तळ ठोकून बसणार आहे.पाणी आवर्तन सोडण्यात येत नसल्याने पाणी असून पाण्याचा उपयोग होत नव्हता. एप्रिल, मे, जून महिन्यात पिकासाठी पाणी मिळत नव्हते. शेतकऱ्यांना सिंचन व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना या भागातील जनतेला करावा लागतो. दरवर्षी पाणीसाठा जास्त असल्याचे कारण देत दुरुस्तीसाठी टाळाटाळ केली जात होती. दरवर्षी भेगू प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत नसल्याने दुरुस्ती करण्यास अडचणी येत होत्या. दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या दुरुस्ती विभागाकडे सोपविण्यात आले असल्यामुळे त्याची दुरुस्ती होऊन सर्वांना पाणी मिळेल असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने व्यक्त केला.राज्यातील पहिला प्रयोग २००० मध्ये यशस्वीगुजरात राज्यालगत कळवण तालुक्यात मांगलीदर पाड्याजवळ उगम पावणारी पश्चिम वाहिनी भेगू नदीचे गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी मांगलीदर गावाजवळ माजीमंत्री स्व. ए. टी. पवार यांनी १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे भेंगू लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून अडविले. तेथून कालव्याद्वारे गिरणा खोऱ्यात पाणी वळवून पश्चिम वाहिनी नदीचे पाणी पूर्व वाहिनी करून त्या पाण्याचा २० गावातील आदिवासी बांधवांना लाभ मिळवून दिला आहे . गुजरातला वाहून जाणारे पाणी कळवण तालुक्यात वळवून आणण्याचा राज्यातील पहिला प्रयोग स्व. पवार यांनी सन २००० मध्ये यशस्वी केल्यानंतर २०१६ पर्यंत पाणी सुरळीत असल्यामुळे या भागाला पाण्याचे आवर्तन मिळत होते. जानेवारी २०१६ मध्ये ल.पा.प्रकल्पाच्या पाईप मुखाशी दरड कोसळल्याने पाईप विमोचकामधून पाणी येणे बंद झाले. पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून तपासणी करून पाणबुड्याचा वापर करून पाणी सुरू करण्याचे प्रयत्न केले परंतु यश आले नव्हते. त्यामुळे या पाण्यापासून विरशेत ,मांगलीदर , चाफापाडा आदी २० गावातील आदिवासी बांधव वंचित झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.फोटो - ०१ कळवण १

टॅग्स :talukaतालुकाwater scarcityपाणी टंचाई