शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:30 IST

भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजार भरत असल्याने आठवडे भाजीबाजाराच्या दिवशी तर वाहतुकीसह पादचारी मार्गाला बे्रक लागत आहे.

पंचवटी : भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजार भरत असल्याने आठवडे भाजीबाजाराच्या दिवशी तर वाहतुकीसह पादचारी मार्गाला बे्रक लागत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या दैनंदिन तसेच आठवडे भाजीबाजारामुळे भाजीपाला विक्रेते तसेच शेकडो ग्राहकांचा जीव धोक्यात येत असला तरी याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावरचे भाजीबाजार अपघाताला निमंत्रण ठरताहेत.  विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत महापालिकेने वाजतगाजत हॉकर्स झोन तयार केले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी तर दूरच उलट रिक्त झालेल्या जागांवर नवीन अतिक्रमणे होत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत.पंचवटी विभागातील महामार्गालगत असलेल्या हिरावाडी, कमलनगर चौफुली, हनुमाननगर, तारवालानगर ते अमृतधाम चौफुली रस्त्यावर दर सोमवारी आठवडे बाजार भरतो. यातील हनुमाननगर येथील भाजीबाजार काही महिन्यांपूर्वीच निलगिरी बाग परिसरात स्थलांतरित करण्यात आलेला आहे. तर दर शनिवारी अमृतधाम चौफुलीवर भरणारा आठवडे भाजाीबाजार सध्या अयोध्यानगरी परिसरातील नागरी वसाहतीत असलेल्या रस्त्यावर भरत आहे. हिरावाडीतील (कमलनगर) परिसरात दर सोमवारी भरणाºया आठवडे बाजाराची व्याप्ती तर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. रिंगरोडवर बसलेला भाजीबाजार आता एसएसडीनगर रस्ता, अभिजितनगरपर्यंत पसरलेला आहे. सोमवारच्या दिवशी तर वाहने सोडाच परंतू नागरिकांनादेखील पायी चालण्यासाठी कसरत करावी लागते. या आठवडे बाजारामुळे क्रीडा संकुलकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडत असल्याचे चित्र दिसून येते. या भाजीबाजारात भरेकरी विशेषत: शेतकरी वर्गाची संख्या मोठी असल्याने त्यांना आठवडे बाजारासाठी प्रशासनाने तात्पुरती का होईना जागा करून देणे गरजेचे आहे, मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सध्या तरी शेकडो विक्रेत्यांना व भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना जीव धोक्यात घालूनच भाजीबाजारात यावे लागत आहे.अशीच परिस्थिती दिंडोरीरोड तसेच पेठरोडवर भरणाºया दैनंदिन भाजीबाजाराची आहे. सायंकाळच्या सुमाराला तर या रस्त्याने वाहने नेताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या रस्त्यावर किरकोळ अपघात घडतात. भाजीबाजार नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी ठरत असली तरी या भाजीबाजाराबाबत प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. पेठरोडवर तर सायंकाळच्या सुमाराला दैनंदिन रस्त्याच्या दुतर्फा भाजीबाजार भरतो.या भाजीबाजाराची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रस्त्यातच वाहने उभी करावी लागतात. झोपडपट्टीचा परिसर असल्याने अनेकदा या रस्त्यावर लहान मुले खेळतात त्यातच वाहनांची ये-जा त्यामुळे अनेकदा वाहनांचा धक्का लागून किरकोळ अपघात होऊन त्यातून शाब्दिक वादावादी सुरू असल्याचे दिसून येते.या भाजीबाजारांमुळे नागरिक त्रस्तझाले आहेत. नवीन जागेची निश्चिती आणि बाजारांचे स्थलांतर कधी होणार असा प्रश्न केला जात आहे.दिंडोरीरोडवर सायंकाळच्या सुमारास निमाणी बसस्थानकाकडे येणाºया रस्त्यावर भाजीबाजार सुरू होतो. याच ठिकाणी प्रवासी काळ्या टॅक्सी उभ्या असतात तर निमाणी बसस्थाकाजवळच्या पादचारी मार्गावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र दिसते. त्यामुळे रस्त्याने पायी जाणाºया पादचाºयांना जागा नसल्याने त्यांना पायी जाताना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते.पंचवटीच्या अन्य अनेक भागात अशाप्रकारे रस्त्यावर भाजीबाजार वाढत आहे. नागरिकांची ती गरज असली तरी महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने सोसायटी परिसरातील खुल्या जागांमध्ये पाच टक्के जागा भाजी विक्रेत्यांसाठी सोडण्याबाबत बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र त्यावर पुढे कार्यवाही झालेली नाही.एकीकडे रस्त्यावर भाजीबाजार भरत असताना दुसरीकडे गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करू न आयुर्वेद महाविद्यालयासमोर भाजीमंडई उभारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजीमंडईत विक्रेते येतच नसल्याने सध्या बेघर तसेच भिकाºयांनी या मंडईचा ताबा घेतलेला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भाजीमंडईची पाहणी करून भाजी विक्रेत्यांना भाजीमंडईत स्थलांतराचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने भाजीमंडईची साफसफाई केली होती, मात्र त्यानंतर कोणतीही कृती झालेली नाही. भाजीमंडईची इमारत सध्या धूळ खात पडून असल्याने तूर्तास पालिकेने केलेल्या भाजीमंडईचा खर्च वाया गेल्याचे दिसत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका