शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

भगूरची शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

By श्याम बागुल | Updated: August 24, 2018 15:49 IST

भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० मे १९८६ रोजी करण्यात येऊन

ठळक मुद्देभगूर पालिकेचे दुर्लक्ष : आवारात मद्यपींच्या रंगतात पार्ट्याचार ते पाचवेळा स्मरणपत्रे पाठविली असून, तरीही त्याची दखल नाही.

भगूर : भगूर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, सदरची शाळा पालिकेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शाळेला भाड्याने दिलेली आहे. परंतु शाळा मोडकळीस आली असून, कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे.भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० मे १९८६ रोजी करण्यात येऊन त्यावेळी शाळेसाठी १८ खोल्या आणि तळमजल्यावर सार्वजनिक कार्यासाठी सभागृह उभारण्यात आले. उद्घाटनानंतर पालिकेने सदरची शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेला इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गासाठी भाड्याने दिली, तर तळमजल्यावरील सभागृह नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात असल्याने पालिकेला त्यापासून उत्पन्न मिळायला लागले. कालांतराने या इमारतीची डागडुजी कोणी करावी, असा वाद निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने शाळेचे स्थलांतर केले. त्यानंतर ही शाळा नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव बालमंदिर शाळेस १९९८ भाड्याने देण्यात आली. आता या शाळेची दुरवस्था झाली असून, जवळच असलेल्या झोपडपट्टीतील तरुणांनी या इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडून टाकल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील सभागृहाचे दरवाजे व खिडक्या काढून नेल्या असून, या ठिकाणी दारूच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. फक्त इमारतीच्या पुढील भागात मैदान असून, काही वर्गखोल्या चांगल्या आहेत. त्यात अभिनव बालविकास मंदिर आणि बालवाडीचे सहा वर्गात २०० मुले शिक्षण घेत आहेत. ही संस्था भगूर नगरपालिकेला ३३ हजार रुपये दरवर्षी भाडे अदा करीत असताना त्यामानाने भगूर पालिका इमारतीला काहीच सुधारणा देत नाही. इमारत धोकेदायक झाली आहे. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिकेला चार ते पाचवेळा स्मरणपत्रे पाठविली असून, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक