शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

By admin | Updated: August 4, 2014 02:13 IST

अखेरच्या प्रवासातही मिळेना चांगला रस्ता

 

प्रवीण साळुंके

मालेगावयेथील महापालिका हद्दीतील पश्चिम भागात रस्त्यांची दुरवस्था ही नित्याच्याचीच बाब आहे. जिवंतपणी तर नाहीच पण मृत्यूनंतरच्या अखेरच्या प्रवासासाठीही चांगला रस्ता मिळू नये यासारखे दुर्दैव नाही. येथील मोचीवाडा भागात शिवाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अंतिम संस्काराला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. महानगरपालिका दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवित असताना शहराच्या पूर्व भागात बोटावर मोजण्याइतके रस्ते सोडल्यास सर्वच रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, पश्चिम भागात तर विनाखड्ड्याचा रस्ता हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांना चांगल्या रस्त्याची अपेक्षा किंवा सवयच नसल्याने जिवंतपणी त्यांना खड्ड्याच्या रस्त्यावर वावरणे भाग पडते. मात्र अंतिम संस्काराला जाण्याचा रस्ता तरी किमान चांगला असावा अशी कॅम्पवासीयांची अपेक्षा आहे. मात्र संवेदनहीनतेचा कळस गाठलेल्या मनपाकडून ही अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही. कॅम्प भागातून अंतिम संस्कारासाठी शिवाजीनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर उंचवटे, चाऱ्या व खड्डे पडलेले असल्याने अंत्ययात्रा नेताना हाल होतात. पायी जाणाऱ्यांचे पाय एकमेकांत अडकत असल्याने मृतदेह पडण्याची शक्यता असल्याने जीवमुठीत धरून चालावे लागते. अंतिम संस्कारास वैकुंठरथाचा वापर केल्यास या रस्त्यावरून ही रथयात्रा जात असताना उंचवट्यामुळे रथ खाली-वर होत असून, त्यामुळे मृतदेह खाली पडण्याची शक्यता असते. रस्त्यावरील खड्डे व चाऱ्यांमध्ये धक्के बसल्याने काहीवेळा अंत्यविधीसाठी वापरण्यात येणारे मडके फुटते तसेच मृतदेहाशेजारी बसलेले नातेवाईक एकमेकांवर आदळतात, तर काहींच्या डोक्याला वाहनाचे टप लागते. त्यामुळे हा रस्ता कधी संपतो? असा प्रश्न पडतो. त्यातच रस्ता कमी रुंदीचा असून, त्यावर अतिक्रमण आहे. रस्त्यावर नेहमीच मोठ-मोठे दगड पडलेले असतात. अनेक रस्ते महिनाभरात, तर बुजविलेले खड्डे काही तासातच पूर्ववत होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नव्वद लाख रुपये खर्चाचा सटाणा रस्ता तसेच कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या पाच वर्षांत पूर्ण न झालेला कॅम्प रस्ता होय. जिवंतपणी मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने किमान स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी अपेक्षा कॅम्पवासीयांनी व्यक्त केली आहे.